• Wed. Mar 11th, 2026

    Gunaratna Sadavarte : ‘हजारो लग्न झालेल्या महिला पाकिस्तानातून भारतात आल्या?’; गुणरत्न सदावर्ते यांचा नेमका दावा काय?

    Gunaratna Sadavarte : ‘हजारो लग्न झालेल्या महिला पाकिस्तानातून भारतात आल्या?’; गुणरत्न सदावर्ते यांचा नेमका दावा काय?

    Gunaratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पाकिस्तानातून भारतात विवाह करून आलेल्या महिलांविषयी शंका व्यक्त केली आहे. हा ‘मॅरेज जिहाद’ आहे का, याची तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली. जितेंद्र आव्हाड यांनी यावर प्रतिक्रिया द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच, मदरशांमध्ये तपासणी करण्याची मागणी सदावर्ते यांनी केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    यवतमाळ : पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांच्या नागरिकांना बंदी घातली आहे. तसेच आपापल्या नागरिकांना मायदेशी परत बोलावलं आहे. त्यामुळे भारतात आलेले पाकिस्तानी नागरीक पाकिस्तानात परत जात आहेत. तर पाकिस्तानला गेलेले भारतीय नागरीक हे परत मायदेशी येत आहेत. या दरम्यान वकील गुणरत्न सदावर्ते यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे. “हजारो लग्न झालेल्या महिला या पाकिस्तानातून भारतात आल्या. हे लक्षात येत आहे. त्यामुळे हा मॅरेज जिहाद आहे का? हे सुद्धा तपासणं जरुरीचं आहे”, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत.

    “हा मॅरेज जिहाद असेल तर त्याला प्रेम, लग्न या संकल्पनेत मोडलं जाऊ नये. ही एक दहशतवादी कारवाई आहे. हे एक अंडरवर्ल्ड क्रॉसबॉर्डर टेररिझम आहे. हे टेररिझम ठरवून चाललं आहे. या मॅरेज जिहादला थांबवणं आवश्यक आहे. हे लग्न नसून अतिरेकी कारवाई करण्यासाठीची प्रक्रिया आहे का? हे तपासलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे”, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

    ‘जितेंद्र आव्हाडांनी मॅरेज जिहादवर बोललं पाहिजे’

    यावेळी गुणरत्न सदावर्ते यांना आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी आव्हाडांवर संताप व्यक्त केला. “जितेंद्र आव्हाड यांनी मॅरेज जिहादवर बोललं पाहिजे. पत्रकारांना भीती घालण्याचं कारण नाही. या देशात मीडिया चौथा स्तंभ आहे. जितेंद्र आव्हाड आमच्या पत्रकारांना भीती घालण्याएवढे तुम्ही मोठे कधी झालात? ही भीती पत्रकारांना चालत नाही. मॅरेज जिहादवर बोला. पाकिस्तानातून किती आणल्या? त्यांच्यावर कारवाई काय केली, यावर जितेंद्र आव्हाड यांनी बोललं पाहिजे”, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

    ‘मदरशांमध्ये पिरॉडीकल तपासणी झाली पाहिजे’, सदावर्तेंची मागणी

    “यवतमाळच्या पुसद, उमरेख तालुके किंवा लागून असलेल्या हिंगोली जिल्हा असेल या भागात काही ठिकाणी मदरसे चालू आहेत. या मदरशांच्याबाबत आपण पाहिलं असेल की, कोकणात एका मदरशात ज्या पद्धतीने हत्यार सापडले, मग हे कोणतं शिक्षण आहे? सगळ्या मदरशांच्याबाबत, खासकरुन अतिदुर्गम भागात असणाऱ्या मदरशांमध्ये पिरॉडीकल तपासणी झाली पाहिजे. कोकणात जशापद्धतीने हत्यार सापडले त्यापद्धतीने त्या हत्यारांचं शिक्षण दिलं चाललं आहे का? कारण काश्मीरमध्ये आमच्या हिंदुस्तानी नागरिकांनी जे भोगलं त्याप्रमाणे इंटरनल इनसेक्युरिटी चालू झाली आहे का? त्यामुळे या मदशांबाबत तिसरा डोळा उघडून पाहिलं पाहिजे, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

    या मदरशांमध्ये काय चाललं आहे ते बघितलं पाहिजे. कारण जोपर्यंत खंगाळून पाहणार नाही, त्यांच्या डोक्यात काय भरलंय ते पाहिलं जाणार नाही तोपर्यंत अत्यंत चिंतनीय गोष्टी आहेत. प्रभू राम, भगवान गौतम बुद्धांचे विचार, भगवान महावीरांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे खुले विचार आहेत. पण इस्लामिक दहशतवाद या नावाखाली काही चाललंय का? किंवा इस्लामिक जग निर्माण करण्यासाठी मदरशांमध्ये काही चाललं आहे का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. शाहरुख, सलमान खान सारख्या सेलिब्रेटींनीसुद्धा मदरशांमध्ये काय चाललं आहे याबाबत बोललं पाहिजे, असं आवाहन गुणरत्ना सदावर्ते यांनी केलं.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed