bhendwal ghat mandani 2025 : अंबाडी, कपाशी, ज्वारी, तूर, मूग, उडीद, तीळ, भादली, बाजरी, हिवाळी मूग, साळी (तांदूळ), जवस, लाख, वाटाणा, गहू, हरभरा, करडी, मसूर हे धान्य समान अंतरावर गोलाकार घटामध्ये मांडण्यात आले.
चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज व सहकारी सारंगधर महाराज यांनी गुरुवारी पहाटे घटमांडणीतील निरीक्षण करून अंदाज वर्तविले. जळगाव-जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बुधवारी सायंकाळी घटमांडणी करण्यात आली. चंद्रभान महाराजांच्या जयघोषात विधीवत सात फूट व्यासाचा गोलाकार घट तयार करून त्यामध्ये १८ प्रकारच्या धान्यराशी ठेवण्यात आल्या.
अंबाडी, कपाशी, ज्वारी, तूर, मूग, उडीद, तीळ, भादली, बाजरी, हिवाळी मूग, साळी (तांदूळ), जवस, लाख, वाटाणा, गहू, हरभरा, करडी, मसूर हे धान्य समान अंतरावर गोलाकार घटामध्ये मांडण्यात आले. घटाच्या मध्यभागी दोन फूट व्यासाचा खड्डा करून त्यामध्ये मातीची चार ढेकळे ठेवली. ही ढेकळे पावसाच्या चार महिन्यांचे प्रतीक मानली जातात. ढेकळांवर पाण्याने भरलेले करवे ठेवण्यात आले. करव्यावर वडा, भजी, करंजी, पुरी, सांडई, कुरडई, पापड, पानविडा, सुपारी ठेवण्यात आले. या प्रत्येकाचे निरीक्षण करून अंदाज वर्तविण्यात आले.
वर्तविलेल्या अंदाजानुसार, खरीप हंगामात जून महिन्यात पेरणीयोग्य सार्वत्रिक पाऊस नाही. जुलैमध्ये चांगला, ऑगस्टमध्ये साधारण आणि सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस राहील. अवकाळी पावसाचा धोकाही वर्तविण्यात आला. त्यामुळे पिकांची नासाडी मोठ्या प्रमाणात होईल, असा अंदाज आहे. कपाशीचे पीक अनिश्चित राहणार आहे. अंबाडी कायम असल्याने कुलदैवतेचा प्रकोप होणार नाही. ज्वारी घटात असल्याने हे पीक साधारण राहील. तुरीचे पीक साधारण येईल. कारण घटात तूर आत पसरलेली आहे. मूग साधारण, उडीद घटात आणि बाहेर असल्याने भावात तेजी राहील. नासाडीदेखील होईल. तिळाचे पीक चांगले येईल. भावात तेजी असली तरी नासाडी संभवते. भादली पसरलेली असल्याने रोगराईत वाढ संभवते. बाजरीचे पीक चांगले आहे. धान, जवस, लाख, वाटाणा, गहू आणि हरभऱ्याचे पीक साधारण राहील, असे अंदाज सांगण्यात आले.
Nashik Crime : गुंडांची ‘दोस्तीत कुस्ती’, मुलीच्या बर्थडेच्या आमंत्रणासाठी जाताना बाचाबाची, वाढदिवसाआधीच बाप यमसदनी
अशी असतात प्रतीके
अंबाडी कुलदैवत असून मसूर शत्रूचे आणि करडी संरक्षण व्यवस्थेचे प्रतीक आहे. सुपारी राजा, पानविडा राजाची गादी, पुरी पृथ्वी, सांडई-कुरडई चारा व पाण्याचे आणि करंजीला अर्थव्यवस्थेचे प्रतीक मानण्यात येते.
जलाशये तुडुंब
पृथ्वीचे प्रतीक मानली जाणारी पुरी गायब असल्याने पृथ्वीवर नैसर्गिक आपत्ती येणार आहे. पण, करव्यात भरपूर पाणी असल्याने जलाशये तुडुंब भरलेली राहतील, असा अंदाज वर्तविण्यात आला. सांडई, कुरडईचे तुकडे झाल्याने चारापाण्याची टंचाई भासणार नाही.
Bhendwal Bhavishyavani 2025 : पानविडा पहिल्यांदाच गायब, भेंडवळच्या घटमांडणीनुसार ‘राजा’ संकटात; पुरी, कंरजी, कुरडई; कुठल्या प्रतिकाचा अर्थ काय?
घुसखोरी झाली तरी संरक्षण व्यवस्था मजबूत
घटातील मसूर व करडई देशाच्या संरक्षण व्यवस्थेचे प्रतीक आहे. मसूर कायम असल्याने घुसखोरी होईल. परंतु करडई घटात कायम असल्याने संरक्षण व्यवस्था मजबूत राहील. पण, तणावाला सामोरे जावे लागेल, असा अंदाज सांगण्यात आला.
Jeevan Jankar : आमदार जानकरांच्या लेकाचं प्रसंगावधान, धूर दिसताच गाडी पंपाबाहेर नेली, स्कॉर्पिओ पेटली पण…
पानविडा पहिल्यांदाच गायब
घटातील राजाचे प्रतीक असलेली सुपारी कायम असून पडलेली आहे. विड्याचे पान राजाच्या गादीचे प्रतीक असून पानविडा गायब आहे. यापूर्वी पानविडा कधी गायब झाला नव्हता. ही परिस्थिती पाहता केलेल्या निरीक्षणानुसार पुंजाजी महाराजांनी राजकीय तणाव, आर्थिक संकट, परकीय घुसखोरीसह विविध संकटात राजा राहील, असे भाकीत केले आहे. अर्थव्यवस्थेचे प्रतीक असलेली करंजी गायब असल्याने देशावर आर्थिक संकट राहील, असे सांगण्यात आले.

