• Sun. Mar 8th, 2026
    महिलांना बुरखा घालण्याची पद्धत सांगितली,धर्म बदलून नाव..; नाशिककरांचा पहलगाममधील थरारक अनुभव

    Pahalgam Terror Attack News- 22 एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात 28 भारतीयांचा मृत्यू झाला.या हल्ल्यातून नाशिकमधील तीन कुटुंबे थोडक्यात बचावली.या हल्ल्यातून ते कसे बचावले तेथील परिस्थिती नेमकी काय होती याबद्दल त्यांनी सांगितले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    नाशिक: पहलगाममध्ये 22 एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात 28 भारतीयांचा मृत्यू झाला.या हल्ल्यातून नाशिकमधील तीन कुटुंबे थोडक्यात बचावली.या हल्ल्यातून ते कसे बचावले तेथील परिस्थिती नेमकी काय होती याचे अनुभव समीर चौगुले आणि त्यांच्या मित्रांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहेत.

    विनय नरवाल हे आमच्या बाजूने गेले अन्..
    ते म्हणाले की, ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळी जे नौदल अधिकारी विनय नरवाल हे आमच्या बाजूने गेले. त्यांनी हाफ पँट घातली होती. एवढ्या थंडीत ते हाफ पँटवर होते याबद्दल आमच्यात चर्चाही झाली. ज्यावेळी त्या हल्ल्याची बातमी ऐकली आणि सर्वत्र धावपळ उडाली आम्ही ड्रायव्हरला सांगितले की तू गाडी रिसोर्टला घे. इथे थांबवू नको रिस्क आहे. तर ड्रायव्हर म्हणाला कुछ हुआ नही आप सेफ है. आम्ही त्यावेळी मॅगी खात होतो. ती मॅगी तशीच टाकली आणि गाडी बसलो त्या धावपळीत आमची गाडी दोनदा ठोकली.

    आम्हाला कोणीच काही सांगितले नाही
    स्थानिक लोकांनी घटनेबद्दल सांगितले का हा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आम्हाला कोणीच काही सांगितले नाही. पण ते कोणाशी तरी फोनवरुन बोलताना सांगत होते की, दो जन दफन हुआ है,आम्ही त्यांना विचारत होतो काय झाले आहे पण त्यांनी शेवटपर्यंत आम्हाला काही सांगितले नाही. आम्ही रिसोर्टला गेल्यानंतर बातम्या पाहिल्या त्यावेळी आम्हाला कळाले की तिथे मोठी घटना घडली आहे. आपण सुखरुप त्यातून बचावलो गेलो आहे.

    बाथरुमला जायचे असेल तरीही तिघांना सोबत घ्यायचो
    आमचा शेवटचे ठिकाण हे पहलगामला होते. ती जी रात्र होती ती आम्हाला भयानक दृश्य दाखवणारी होती. आमचे तेथे काही लोक ओळखीचे होते. त्यांच्या मदतीने आम्हाला तिथे जेवण आणि इतर व्यवस्था चांगली झाली. त्या दिवशी तिथे मुक्काम केला परंतु तरीपण कोणाला बाथरुमला जायचे असेल तरीही तिघांना सोबत घ्यायचो. ती रात्र तिथे काढली. त्यानंतर पहलगाममधून आम्ही मुक्काम दुसऱ्या ठिकाणी हलवला.

    धर्म बदलून नाव…
    कुटुंबांची काळजी घेताना काही मित्रांनी असे सांगितले होते की, तुमची गाडी अडवली अथवा कोणी विचारपूस केली तर नाव वेगळ्या पद्धतीचे सांगा. आमच्या ज्या महिला होत्या त्यांना आम्ही काजळ लावायला लावले. सिंदुर लावू नका असे सांगितले, डोळ्यात सुरमा लावायला लावला. तसेच बुरखा घालण्याची पद्धत आम्ही त्यांना सांगितली. कानातले घालू नका असे सांगितले. परिस्थिती आली तर धर्म बदलून नाव सांगण्याची तयारी ठेवली होती.आम्ही तेथे गेलो पहिल्यांदाच गेलो होतो आमचे कुटुंबीय घाबरले आहेत. काहीजण आजारीही पडले आहेत. आता कधीच जम्मू काश्मीरचा प्रवास करणार नाही.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब महाराष्ट्र टाइम्स मध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस.
    साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.
    … आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed