Maharashtra Weather Forecast : राज्यात होळीनंतर हवामानात मोठे बदल झाले असून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवसांसाठी मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. नांदेड, लातूर, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
अवकाळीचे संकट राज्यावर कायम
होळीनंतर पारा वाढण्याचे संकेत होते. मात्र, प्रत्यक्षात अवकाळी पावसामुळे वातावरणात मोठे बदल झाल्याचे बघायला मिळाले. अनेक भागांमध्ये गारपिटीसह पाऊस झाला आणि शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. एकीकडे पाऊस पडत आहे तर विदर्भात पारा ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे जाताना दिसतोय. कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. मुंबई आणि पुण्यात वातावरण सामान्य बघायला मिळाले. सांगलीमध्येही पावसाचा इशारा देण्यात आलाय. दोन दिवस उष्णता वाढताना दिसली आणि अवकाळीचे ढग गेल्याचे चित्र होते. मात्र, परत एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Sanjay Raut: ‘त्यांना शिवाजी महाराज कधीच आशीर्वाद देणार नाही, महाराष्ट्र..’,अमित शहांच्या रायगड दौऱ्यावर संजय राऊतांची तोफमराठवाडा आणि विदर्भात पुढील चार दिवस पावसाचा इशारा
आता हवामान विभागाकडून मराठवाडा आणि विदर्भात पुढील चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवार आणि सोमवारी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. विशेष करून नांदेड जिल्हात पावसाला अधिक पोषक वातावरण आहे. यामुळे नांदेड जिल्हात अवकाळी पाऊस होऊ शकतो. काही दिवसांपूर्वीच लातूर जिल्हाला अवकाळी पावसाने झोडपले होते.
बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालन्यात इशारा
पुढील चार दिवस लातूर जिल्हात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना या भागात उद्या पावसाचा अंदाज देण्यात आलाय. फक्त मराठवाडाच नाही तर विदर्भात देखील पावसाच्या सरी कोसळणार आहेत. अमरावती गडचिरोली आणि गोंदियात देखील पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यात अवकाळीला पोषक वातावरण आहे. हवामानात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचे चित्र आहे.

