• Sat. Mar 7th, 2026
    Kalyan Railway Station: कल्याण रेल्वे स्थानकात ‘पाणीबाणी’, कोट्यवधींचं बील थकीत, KDMC कडून पुरवठा खंडित

    Kalyan Railway Station Water Cut – कल्याण रेल्वे स्थानकात गुढीपाडव्यालाच पाणी नसण्याची नामुष्की ओढावली होती. कल्याण डोंबिवली महापालिकेने पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली होती.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    कल्याण: गुडीपाडव्यालाच कल्याण रेल्वे स्थानकात काही तासांसाठी पाणीच नव्हते. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (KDMC) पाणीपुरवठा खंडित केला होता. पाणी बिल थकल्यामुळे महापालिकेने ही कारवाई केली. स्टेशनचे तब्बल ४.४ कोटी रुपये पाणी बिल थकले होते. त्यामुळे महापालिकाने शनिवार संध्याकाळपासून पाणीपुरवठा बंद केला आहे. यामुळे स्टेशनवरील प्रवाशांना खूप त्रास झाला. स्टेशनवर काम करणारे कर्मचारी, रेल्वे हॉस्पिटलमधील लोक, जीआरपी आणि आरपीएफ जवानांना पाण्यासाठी खूप गैरसोय झाली. शनिवारी संध्याकाळी बंद झालेला पाणीपुरवठा रविवारी रेल्वे अधिकाऱ्यांनी १.१७ कोटी रुपयांच्या चालू बिलाची भरपाई करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आला.

    सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने (CRMS) महापालिकाच्या या कारवाईवर टीका केली. “गुढी पाडव्याच्या तोंडावर महापालिकाने ही कारवाई केली. या काळात स्टेशनवर लोकांची खूप गर्दी असते. त्यामुळे अस करणं योग्य नाही, ते अमानवीय आहे,” असे मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी अनिल दुबे म्हणाले. प्रवाशांना आणि कर्मचाऱ्याना पाण्यामुळे खूप त्रास झाला, असेही ते म्हणाले.

    सेंट्रल रेल्वे ( Central Railway) आणि महापालिकामध्ये पाणी बिलाच्या लेट फी भरण्यावरून वाद आहे. सेंट्रल रेल्वेच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही इतर ठिकाणी लेट फी भरत नाही. हा विषय आता मोठ्या पातळीवर सोडवला जाईल.”

    महापालिकेच्या अनेक नोटीसा

    महापालिकाने यापूर्वीही अनेक नोटिसा पाठवल्या होत्या. महापालिकाने २८ मार्च रोजी सेंट्रल रेल्वेला एक पत्र पाठवले होते. त्यात त्यांनी २४ तासांच्या आत पाणी बिल भरण्यास सांगितले होते. बिलामध्ये यावर्षीचे १.०४ कोटी रुपये आणि लेट फीचे ३१ लाख रुपये होते. असे पत्रात नमूद केले.

    कारवाईनंतर बील भरण्याची प्रक्रिया सुरू
    महापालिकाचे जे वॉर्ड अधिकारी सचिन तामखेडे म्हणाले की, “महापालिकाच्या कारवाईनंतर सेट्रल रेल्वेने १.१७ कोटी रुपये भरण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर पाणीपुरवठा परत सुरु करण्यात आला. पुढील आठवड्यात रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. त्यामध्ये बाकीच्या बिलांवर चर्चा होईल.”

    या सगळ्या प्रकरणात सामान्य माणसाला त्रास झाला. महापालिकाआणि CR यांनी एकत्र बसून यावर तोडगा काढायला हवा, जेणेकरून भविष्यात लोकांना त्रास होणार नाही.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब महाराष्ट्र टाइम्स मध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस.
    साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.
    … आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed