• Sat. Jun 6th, 2026
    औरंगजेबाच्या कबरीवरील वादावरुन मुघल वंशजाची फडणवीसांवर टीका

    Aurangzeb Tomb Issue News : औरंगजेबाच्या कबरीला हटवण्याची मागणी आणि त्यावरून सुरु झालेला वाद चर्चेचा विषय ठरलाय. मुघल वंशज प्रिन्स याकूब यांनी राष्ट्रपतींना याबद्दल थेट पत्र पाठवले आहे. यासोबतच त्यांनी एक व्हिडीओ देखील यावर तयार केलाय. सध्या प्रशासनाकडून खुलताबादमध्ये तगडा पोलिस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलाय.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : औरंगजेबाच्या कबरीचा विषय वादात सापडलाय. औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे आहे. या कबरीला येथून हटवण्याची मागणी काही संघटनाकडून करण्यात आली. बजरंग दल कबरीच्या विरोधात मैदानात उतरल्याचे बघायला मिळाले. काही राजकीय नेत्यांनी देखील थेट कबरीच्या विरोधात भूमिका घेतली. संभाजी महाराज यांच्यावर इतके अत्याचार करणाऱ्या औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करण्यात आली आणि हा मुद्दा चर्चेत आला. प्रशासनाकडून सध्या कोणताही चुकीचा प्रकार घडू नये, याकरिता औरंगजेबाच्या कबर परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

    मुघल वंशज प्रिन्स याकूब हबीबुद्दीन यांनी पाठवले राष्ट्रपतींना पत्र

    जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा सुरू असतानाच नागपूरमध्ये मोठा हिंसाचार झाला. आता मुघल वंशज प्रिन्स याकूब हबीबुद्दीन यांनी औरंगजेबच्या कबरीसाठी राष्ट्रपतींना पत्र पाठवले आहे. यासोबतच देवेंद्र फडणवीसांवर टीका देखील केलीये. मुघल वंशज प्रिन्स हे औरंगजेबच्या कबरीचे काळजीवाहक आहेत. औरंगजेबच्या कबरीचं संरक्षण करण्याची मागणी त्यांनी पत्रातून केलीये.
    Sambhaji Raje : वाघ्याच्या स्मारकाची उंची महाराजांच्या समाधीहून अधिक, हे पटेल का? संभाजीराजे छत्रपतींचा सवालमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका

    वंशज प्रिन्स याकूब हबीबुद्दीनन यांनी म्हटले की, औरंगजेबाच्या कबरी जे काही वाद सुरू आहे, त्याबद्दल आम्ही राष्ट्रपतींना पत्र पाठवले आहे. प्रिन्स याकूब यांच्या म्हणण्यानुसार, औरंगजेबच्या कबरीला हटवणे, काढणे किंवा काही नुकसान पोहोचवणे हे कायद्याच्याविरोधात आहेत. आता औरंगजेबच्या कबरी मुद्दावर प्रिन्स याकूब यांनी उडी घेतल्याचे बघायला मिळतंय. अनेकांकडून ही कबर काढून टाकण्याची मागणी ही सातत्याने केली जातंय.

    औरंगजेबच्या कबरीवरून सुरू आहे वाद

    या पत्रातून प्रिन्स याकूब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केल्याची माहिती मिळतंय. अजित पवार हे छत्रपती संभाजीनगर दाैऱ्यावर होते. यावेळी त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते की, हा इतका जुना मुद्दा काढण्याची काय गरज आहे?. संजय राऊत यांनीही औरंगजेबच्या कबरीवरून भाजपावर जोरदार टीका केली होती. संपूर्ण खुलताबाद शहरात तगडा पोलिस बंदोबस्त हा सध्या बघायला मिळतोय.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed