• Sun. Mar 8th, 2026
    नागपुरात तणाव नियंत्रणात, गृहराज्यमंत्र्यांची माहिती, मूळ कारण काय? योगेश कदम म्हणाले…

    Yogesh Kadam on Nagpur Violence : सोमवारी रात्री साडेबारा-दीड वाजताच्या सुमारास पोलीस प्रशासनाने नागपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. नागपूरच्या काही झोनमध्ये कलम १४४ (कर्फ्यू) आपण लावला आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    नागपूर : नागपुरात सोमवारी रात्री तणाव निर्माण होऊन दगडफेक, जाळपोळ (Nagpur Violence) झाली होती. त्यानंतर शहरात शांतता राखण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी केले आहे. नागपूरची परिस्थित सध्या नियंत्रणात आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी दिली. विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी नागपूरमधील हिंसाचार प्रकरणी प्रतिक्रिया दिली.

    योगेश कदम काय म्हणाले?

    सोमवारी रात्री साडेबारा-दीड वाजताच्या सुमारास पोलीस प्रशासनाने नागपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. नागपूरच्या काही झोनमध्ये कलम १४४ (कर्फ्यू) आपण लावला आहे. काही ठिकाणी गाड्यांचं, दुकानांचं, घरांचं नुकसान झालं आहे. लोक काही घरांमध्ये घुसले होते. अशा गंभीर बाबतीत कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत, अशी माहिती योगेश कदम यांनी दिली.

    भाजप आमदार प्रवीण दटके यांनी केलेल्या दाव्याबद्दल माहिती घेतली आहे. त्यांचं म्हणणं आहे की रात्री दहा वाजता नागरिकांकडून स्थानिक पीआयना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता, पण तो झाला नाही. याचं कारण समोर आलं नाही, पण या घटनेची चौकशी केली जाईल. दोषींवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन योगेश कदम यांनी दिलं.
    Nagpur News: कबरीचा वाद, नागपुरात हिंसाचार; जमावाचा पोलिसांवर वार, DCP निकेतन कदम गंभीर जखमी
    सकाळच्या वेळी एक आंदोलन झालं, कुठलाही वादविवाद न होता दुपारी काही जण पोलीस स्थानकात जमा झाले होते, त्यांचं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालं, वाद तेव्हाच मिटला होता. दुपारी चार-पाच तासांनंतर काही जणांनी प्लॅनिंग केलं असावं, असा अंदाज आहे, मात्र खात्रीशीररित्या सांगता येणार नाही. घर आणि गाड्यांवर हल्ले करण्यात आले, याचं कुठून आणि कोणी प्लॅनिंग केलं, याची चौकशी करण्यात येईल, असंही कदम म्हणाले.
    Nagpur Violence: पोलीस नेहमीच्या ठिकाणी का नव्हते? नागपूर राड्यावरुन भाजप आमदाराचा संताप
    हिंसाचाराचं कारण स्पष्ट झालेलं नाही, मात्र ४७ जण ताब्यात घेण्यात आले आहेत. १२-१४ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर २-३ सामान्य नागरिक जखमी आहेत. या घटनेचं मूळ कारण शोधून काढणार, असं योगेश कदम यांनी स्पष्ट केलं.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed