राज्यभरात रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा होत आहे. आबालवृद्ध रंगांमध्ये न्हावून गेले आहेत. पण बदलापूरमध्ये धुळवडीला गालबोट लागलं आहे. बदलापुरातील उल्हास नदीत बुडून ४ मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
बदलापुरात रंगपंचमी खेळल्यानंतर काही मुलं रंग काढायला नदीत उतरली होती. त्यातील ४ जणांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. बुडून मृत्यूमुखी पडलेली चारही मुलं चामटोली जवळच्या पोद्दार गृह संकुलात राहणारी आहेत. चार मुलांच्या अकाली निधनाबद्दल कळताच सोसायटीवर शोककळा पसरली.
घर पाडल्यानंतर २-४ तासांत ‘ती’ बातमी आली; खोक्याच्या बहिणीचे आरोप, रोख कोणावर?
बदलापूरच्या चामटोली भागात राहणाऱ्या ४ मुलांनी धुळवड साजरी केली. त्यानंतर ते अंगाला लागलेला रंग काढण्यासाठी उल्हास नदीजवळ पोहोचले. चारही मुलं अल्पवयीन होती. त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. चारही मुल पाण्यात बुडाली. चौघांच्या मृत्यूमुळे चामटोली परिसरात एकच खळबळ उडाली.
तरुणाला कुत्रा चावला, रेबीजची लागण; वेदना असह्य, आरसा फोडून काचेच्या तुकड्यानं गळा कापला
आर्यन मेदर (१५), आर्यन सिंह (१६), सिद्धार्थ सिंह (१६), ओमसिंग तोमर (१५) अशी मृत मुलांची नावं आहेत. चौघे पाण्यात बुडाल्याची माहिती समजताच पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं चौघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले. चार मुलांच्या अकाली निधनानं धुळवड सणाला गालबोट लागलं आहे.

