MLC Election : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीत उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग सुरु असल्याची माहिती आहे. या दरम्यान भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी तीन नेत्यांची नावे दिल्लीच्या पक्षश्रेष्ठींकडे पाठवली आहेत. पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर त्या तीन नेत्यांची उमेदवारी निश्चित होणार आहे. दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी यांची नावे महाराष्ट्र भाजपकडून दिल्लीला पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आल्याची माहिती ‘एबीपी माझा’ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
राज्याचं सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनानंतर 27 मार्चला विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान होणार आहे. मतदानानंतर त्याच दिवशी मतमोजणी देखील होणार आहे. त्यामुळे त्यात दिवशी निकालदेखील समोर येणार आहे. या निवडणुकीत भाजपच्या वाटेला तीन तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वाटेला प्रत्येकी एक जागा आल्या आहेत. या जागांवर उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार लॉबिंग केली जात आहे. असं असताना भाजपची तीन नावे निश्चित झाल्याची माहिती आहे.
Bomb threat : पिंपरी चिंचवडच्या डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल, पुण्यात एकच खळबळ
राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही हालचाली
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही हालचालींना वेग आला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निश्चित करण्यासाठी महत्त्वाची बैठक पार पडत आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीनंतर पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत उमेदवार निश्चित केला जाणार आहे. अनेकजण उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बघून पक्षाकडून संधी दिली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, शिवसेनेकडून काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले रवींद्र धंगेकर यांना संधी दिली जाते का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

