Devendra Fadnavis On Team India : चॅम्पियन ट्रॉफी फायनल सामन्यावर क्रिकेटप्रेमींचं लक्ष आहे. रोहित शर्मा आयसीसीच्या स्पर्धेतील फायनलमध्ये चौथ्यांदा कर्णधार जबाबदारी पार पडणार आहे. २०१९ च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया ताकद लावेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाच्या विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
भारत नक्की ही मॅच जिंकेल, ज्या प्रकारे टीमने संपूर्ण टूर्नामेंटमध्ये प्रदर्शन केलं आहे. त्यामुळे भारताला १०० टक्के जिंकण्याची संधी असून आमच्याही शुभेच्छा असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. टीम इंडियाला न्यूझीलंडने २०१९ च्या वन डे वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलमध्ये पराभूत करत १३० कोटी भारतीयांच्या डोळ्यात पाणी आणलं होतं. त्या पराभवाचाही टीम इंडिया वचपा काढण्यासाठी आपली संपूर्ण ताकद लावताना दिसेल.
टीम इंडियासाठी आजच्या फायनल सामन्यासाठी जमेची बाजू म्हणजे चॅम्पियन ट्रॉफीचे सगळेच सामने या मैदानावर खेळले आहेत. तर न्यूझीलंडने लाहोरमध्ये खेळलेत. त्यामुळे न्यूझीलंडला याचा फटका बसणार यात काही शंका नाही. साखळी सामन्यांवेळी टीम इंडिया आणि न्यूझीलंड एकाच ग्रुपमध्ये होते. स्पर्धेत दोन्ही टीम एकदा समोरा-समोर आल्या असून त्यामध्ये टीम इंडियाने किवींना पराभवाची धूळ चारली होती.
दरम्यान, आज रोहित शर्मासुद्धा कर्णधार म्हणून एक मोठा विक्रम आपल्या नावावर करणार आहे. रोहित शर्मा आयसीसीच्या स्पर्धेत फायनल सामन्यामध्ये चौख्यांदा नेतृत्त्व करण्याच्या धोनीच्या विक्रमासोबत बरोबरी करणार आहे. रोहितने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप, वन डे वर्ल्ड कप २०२३, टी-२० वर्ल्ड कप २०२४ आणि चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये आज चौथ्यांदा टीम इंडियाचे नेतृत्त्व करताना दिसेल. रोहितने आपल्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाला टी-२० वर्ल्ड कप जिंकून दिला आहे. आता आयसीसीची दुसरी ट्रॉफी नावावर करण्यासाठी रोहितकडे मोठी संधी असणार आहे.

