Massajog Sarpanch Santosh Deshmukh Case : राष्ट्रवादी आमदार सुप्रिया सुळे यांनी मस्साजोग येथे जात मयत सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेट घेतली. जितेंद्र आव्हाडांनीही सत्य समोर आणून सांगितले की देशमुखांच्या मृत्यूच्या मागे एक डाव होता, ज्याचा प्रयत्न अपयशी ठरला. वैभवी देशमुखने यावेळी त्यांच्या कुटुंबाच्या दु:खाची जाणीव व्यक्त केली.
संतोष देशमुखांचा मृतदहे कुठे आहे हे सांगितल्यावर आमच्या गावातील लोकं जाण्याआधी पोलिसांनी रूग्णवाहिका बोलावत कळंबकडे नेली. बॉडी लपवायची नव्हती त्याला वेगळं वळण द्यायचं होतं, असं ग्रामस्थ सांगत असताना जितेंद्र आव्हाडांनी सविस्तरपणे सांगितलं. कळंबला त्यांनी एक महिलेला तयार केली होती. संतोष देशमुख त्यांच्या मागे लागले होते ते तिथे गेल्यावर त्यांच्यासोबत असं काही घडलं. पण त्याचा प्रयत्न काही सफल झाला नाही. कारण गावातील मुलं त्यावेळी गाडीच्या मागेपुढे होती, असा खळबळजनक खुलासा आव्हाडांसह ग्रामस्थांनी केला.
वैभवी देशमुखचा खळबळजनक खुलासा
लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. जे दु:ख आज आमच्या कुटुंबावर ते इतर कोणावर येऊ नये. आम्हाला आधी काही माहित नव्हतं, पवनचक्कीच्या वादावेळी ओळख झाली. अशोक सोनवणेंनी मारहाण झाल्यामुळे त्यांनी पप्पांना बोलावून घेतलं. माझे वडील छोटं भाडण झालं तरी जाऊन मिटवायचे. त्यावेळी पप्पा गेले तेव्हा त्यांनाही मारहाण झाली, सरपंचाला इथे येऊन मारल्यामुळे गावकऱ्यांनी तिथे जाऊन त्यांना मारलं. त्यानंतर पप्पा आम्हाला भेटायला लातूरला येत होते तेव्हा त्यांच्या पाठिमागे आले, नंतर ९ तारखेला त्यांची हत्या झाली. आधी आम्हाला माहित नव्हतं, पण आता समोर येत आहे की ६ तारखेपासूनच ते पप्पांच्या मागे होते, असं वैभवी देशमुखने सांगितलं.
दरम्यान, पुण्यात सीआयडी ऑफिसमध्ये वाल्मिक कराड याला घेऊन आलेल्या माणसावरही काही कारवाई नाही. ६ डिसेंबरला जर अॅट्रॉसिटी दाखल केली असती तर ९ डिसेंबरला हे झालंच नसतं. संतोष देशमुखांना ३.२८ मिनिटांनी त्यांना उचललं आणि ३.४० ला आम्हाला समजलं. आम्ही पोलीस चौकीत गेल्यावर ६ वाजेपर्यंत आमची तक्रार घेतली नाही. त्यानंतर गुन्हे दाखल केले ज्याला १५ मिनिटांत जामीन होणार असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं.

