“पुण्यात जीबीएस आजार पसरतोय. कशामुळे पसरतोय तर दुषित पाणी. कोण जबाबदार? उत्तर कोण देतंय? महापालिका विसर्जित झाली. महापौर नाही. पण नगरविकास खात्यात जे बसले आहेत त्यांना जाब विचारा, काही मिळालं नाही तर गावात जावून बसतो आणि रेडा कापतोस”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर केला.
“23 जानेवारीच्या सभेत बोललो होतो की, हे जे लाचार सेनेचे प्रमुख नेते आहेत, लाचार सेनाच आहे, नेता कसा असला पाहिजे, त्याच्याकडे बघितलं की प्रेरणा आली पाहिजे, हे कुठले नेते? डोकं नाहीच आहे, मग दाढी खाजवायची. त्यांच्याकडे बघून कुणाला प्रेरणा मिळत असेल तर जा बाबा तुझं भलं होवो. पण प्रत्येक वेळेला काही झालं की रुसूरुसू बाई रुसूरुसू गावात जाऊन बसू”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली.
‘त्या काळोखात काय चेंगराचेंगरी होईल’
“मिंध्यांचं आयुष्य जे आहे, अरे काजवा जरी चिमुटभर असला तरी स्वयंप्रकाशित असतो, हे स्वयंप्रकाशित कुठे यांच्यावर दिल्लीतून टॉर्च पडतोय तोपर्यंत ते दिसताय. दिल्लीतून टॉर्च बंद झाला की, मग अंधारात कुठे जातील कळत नाही. मग त्यांच्याबरोबर जे गेलेले आहेत त्या काळोखात काय चेंगराचेंगरी होईल काय कळणार नाही. त्यांचं भवितव्य फार बिकट आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
Ladki Bahin Yojana : अपात्र लाडक्या बहिणींकडून सरकार पैसे परत घेणार? अजित पवार यांनी दिली महत्त्वाची माहिती
‘काही मिळालं नाही तर गावात जावून बसतो आणि रेडा कापतोस’
“पुण्यात जीबीएस आजार पसरतोय. कशामुळे पसरतोय तर दुषित पाणी. कोण जबाबदार? उत्तर कोण देतंय? महापालिका विसर्जित झाली. महापौर नाही. पण नगरविकास खात्यात जे बसले आहेत त्यांना जाब विचारा, काही मिळालं नाही तर गावात जावून बसतो आणि रेडा कापतोस. पुणेकरांना दुषित पाण्यातून रोग होतोय. जबाबदार कोण?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

