• Fri. Mar 6th, 2026
    पासपोर्ट, व्हिसाविना मुंबईत २० वर्षांपासून वास्तव्य; दोन बांग्लादेशी महिलांवर पोलिसांची मोठी कारवाई

    Mumbai Crime News : मुंबईतील वांद्रे परिसरात राहणारा बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी बांग्लादेशी नागरिकाला अटक केल्यानंतर अवैध बांग्लादेशीचा प्रश्न पुन्हा प्रकाशात आला आहे. यातच मीरा रोड येथून दोन बांग्लादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : मुंबईतील वांद्रे परिसरात राहणारा बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी बांग्लादेशी नागरिकाला अटक केल्यानंतर अवैध बांग्लादेशीचा प्रश्न पुन्हा प्रकाशात आला आहे. यातच मीरा रोड येथून दोन बांग्लादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही महिला गेल्या २० वर्षांपासून मुंबईतील मीरा रोड येथे पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय राहत होत्या. सैफ अली खानवरील हल्लाच्या घटनेनंतर, मुंबईसह संपूर्ण महानगर क्षेत्रात अवैध बांग्लादेशींवर कडक कारवाई केली जात आहे. महाराष्ट्र पोलिसांनी बुधवारी दोन बांग्लादेशी महिलांना अटक केली आहे.

    मुंबईत कशा पोहोचल्या महिला?

    मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या (एमबीव्हीव्ही) अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलच्या (एएचटीसी) माहितीनुसार, या दोन्ही महिला बांगलादेशी आहेत. हे दोघेही गेल्या २० वर्षांपासून पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय मीरारोडमध्ये बेकायदेशीरपणे राहत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गुप्त माहितीच्या आधारे, पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी पथकाने भाईंदर पश्चिमेतील गोकुळ गावाजवळील एका इमारतीवर छापा टाकला होता आणि तेथे असणाऱ्या दोन महिलांना ताब्यात घेतले. आता त्या येथे कशा आल्या याचा तपास पोलीस करत आहेत. याशिवाय, त्या जेथे भाड्याने राहत होत्या च्या घराचे मालक आणि त्यांच्या रोजगाराच्या स्रोतांची माहिती सध्या गोळा केली जात आहे.
    Coins In Stomach: तरुणाला वेदना असह्य, डॉक्टरांकडून लगेच ऑपरेशन; पोटात सापडली ३३ नाणी अन् समोर आली भयानक कहाणी
    महाराष्ट्र पोलिसांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये बेकायदेशीर बांगलादेशींविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत दररोज बेकायदेशीर बांगलादेशींव कारवाई केली जात आहे. २०२४ मध्ये, मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत मानवी तस्करी, नालासोपारा युनिटच्या पथकाने २९ बेकायदेशीर बांगलादेशींवर कारवाई केली होती, ज्यात १२ महिला आणि १७ पुरुषांचा समावेश होता. यावर्षी जानेवारीमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये २ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. महाराष्ट्रात बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध पोलिसांकडून रँडम पद्धतीने तपासणी केली जात आहे. दरम्यान चार दिवसांपूर्वी ठाण्यातून चार बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आताची ही मोठी कारवाई आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed