Authored byमानसी देवकर | Contributed byदीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम28 Dec 2024, 9:25 pm
सरपंच प्रकरणात देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी बीडमध्ये आंदोलन पेटून उठलंय. अंजली दमानिया सुद्धा दररोज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आहेत. मात्र शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय मोर्चावर दमानियांनी टीका केली आहे. हा मुक मोर्चा राजकीय होता, यातून काही साध्य होणार नाही, असं त्या म्हणाल्या. तर सुरेश धस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना धसांना भ्रम झाला असल्याचंही त्या म्हणाल्या. तसेच धनंजय मुंडे राजीनामा देत नाही तोपर्यंत मी लढणार असेही त्यांनी जाहीर केले.