• Sat. Sep 21st, 2024
क्रीडा स्पर्धा अन् सांस्कृतिक कार्यक्रम घेतले; रोषणाईने डोळे दिपले, आता संकुलाची बत्तीगुल

चंद्रपूर: जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात येणाऱ्या विसापूर क्रीडा संकुलनाचे लाखो रुपयांचे विद्युत देयक थकीत होते. देयकाची भरणा न केल्याने महावितरण कंपनीने आज दुपारी वीज पुरवठा खंडित केला आहे. काही दिवसापूर्वी या संकुलाने उजेडाचं पांघरुन ओढलेलं होत. आज मात्र इथं अंधार दाटला आहे. हे तेच क्रीडा संकुल जिथं ६७ वी राष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धा पार पडली. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि नामवंत खेळाडूंनी हजेरी लावली होती.
कोरोना काळात पवार कुटुंबियांनी वसुली केली, सिरमकडून ४३२ कोटी प्रतापराव पवारांच्या खात्यात, सोमय्यांचा गंभीर आरोप
सोहळ्याची भव्यदिव्यताची थेट मुख्यमंत्री शिंदे यांनी कौतुक केलं होतं. चर्चा जिल्हाभर झाली. मोठा झगमगाट केला गेला. विद्युत रोषणाईने तर अनेकांचे डोळे दिपले. ज्या क्रीडा संकुलात ही स्पर्धा झाली त्या संकुलात आता अंधार दाटला आहे. विद्युत देयकाचा भरणा न केल्याने महावितरणाने ही कार्यवाही आज दुपारी केली. ज्या स्पर्धेच्या जाहिरातीसाठी लाखो रुपये उधळल्या गेले. ती स्पर्धा जिथे पार पडली त्याच विद्युत देयक भरायला क्रीडा प्रशासनाकडं निधी नाही, ही मोठी शोकांतिका आहे. हे क्रीडा संकुल बल्हारपूर तालुक्यातील विसापूर येथे आहे. मंत्री तथा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून भव्यदिव्य अशी ६७ वी राष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धा घेण्यात आली. तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम इथे पार पडले. या सोहळ्याची भव्य दिव्यता बघून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तोंडभर मुनगंटीवार यांचे कौतुक केले होते.

स्पर्धा आटोपली आणि जिथे ही स्पर्धा झाली त्या संकुलाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झालं. वेळेवर विद्युत देयकाची भरणा न केल्याने या क्रीडा संकुलाचा विद्युत पुरवठा आज दुपारपासून खंडित करण्यात आला आहे. स्पर्धेच्या निमित्ताने भव्य दिव्य अशी रोषणाई करण्यात आली. त्यामुळे विद्युत देयक लाखांच्या वर गेलं. २ लाख ९ हजार १०० रुपयाचे देयक थकीत आहे. देयक भरलं गेलं नाही. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. एका नेत्याच्या अट्टहासाने या क्रीडा संकुलात क्रीडा स्पर्धेची तयारी करणाऱ्या खेडाळूवर मात्र संकट ओढावलं आहे.

कोविड काळातील ४३५ कोटीच्या वसुलीचा हिशेब द्या, किरीट सोमय्यांचा पवार कुटुंबावर गंभीर आरोप

मंत्री सुधीर मुनगंटीवार सध्या विश्वविक्रम करण्यात व्यस्त आहेत. खिचडीचा विक्रमाची अद्याप चर्चा संपलेली नसताना आता दीप महोत्सव महायज्ञाची तयारी सुरू झाली आहे. पत्रकार परिषदेतून तशी माहिती मुनगंटीवार यांनी आज दिली. जिल्हातील तीस गावावर जलसंकट कोसळलं आहे. तर जिल्ह्यात अनेक समस्या उभ्या आहेत. खरंतर या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यायला हवं. तसं होताना दिसत नसल्याने नागरिकात रोष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed