• Sat. Sep 21st, 2024
गिटार वाजवण्याचा छंद; राहुल गांधींच्या जवळचे, तरीही कॉंग्रेसला रामराम, कोण आहेत मिलिंद देवरा?

राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. मात्र अशातच माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची घोषणा X प्लॅटफॉर्मवरून केली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे मिलिंद देवरा यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, त्यांचे काँग्रेस पक्षाशी असलेले ५५ वर्षांचे नाते आज संपत आहे. त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे.

मिलिंद देवरा हे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते होते. तसेच काँग्रेसला पक्षानिधी मिळवून देण्यात देवरा यांचा मोठा हातखंड होता. मात्र २०१४ मध्ये राहुल गांधी यांच्या टीममधील मानले जाणारे देवरा आणि राहुल गांधी यांचे संबंध बिघडले. त्यानंतर मिलिंद देवरा यांचे खच्चीकरण केले जात असल्याची चर्चा होती. मात्र भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होताच राहुल गांधी यांनी पुन्हा मिलिंद देवरा यांच्यावर कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. मात्र भारत जोडो न्याय यात्रा सुरू होताच मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.
एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून नरेंद्र मोदींचे हात बळकट करायचेत, मिलिंद देवरांचं वक्तव्य, शिवसेनेत दाखल
कोण आहेत मिलिंद देवरा?

मिलिंद देवरा यांचा जन्म ४ डिसेंबर १९७६ रोजी झाला. ते काँग्रेसचे दिग्गज नेते दिवंगत मुरली देवरा यांचे पुत्र आहेत. त्यांचे शिक्षण हे बोस्टन युनिव्हर्सिटी येथून झाले. तर १४ व्या लोकसभेत मिलिंद देवरा हे सगळ्यात तरुण खासदार होते. त्यांना युपीए २ च्या काळात माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री म्हणून काम करता आले. तसेच २०१२-१४ या कालावधीत मिलींद देवरा यांनी जहाज बांधणी राज्यमंत्री म्हणून काम केले. पुढे २०१४ मध्ये मिलिंद देवरा यांचा शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी १ लाख २० हजार मतांनी पराभव केला. तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत १ लाख मतांनी मिलींद देवरा यांचा पराभव केला. त्यामुळे मिलिंद देवरा यांनी २०१९ मध्ये मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुंबई काँग्रेस गटबाजीने ग्रासलेली पहायला मिळाली.

मिलिंद देवरा यांनी २००४ आणि २००९ मध्ये मुंबई दक्षिण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. यावेळी ते येथून उमेदवारी करू शकणार नाहीत, अशी चर्चा होती. मिलिंद यांनी काँग्रेस पक्षात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. लोक त्यांना मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष म्हणून ओळखतात. याशिवाय यूपीए सरकारच्या काळात केंद्रात राज्यमंत्री म्हणून दळणवळण, माहिती तंत्रज्ञान आणि जहाजबांधणी मंत्रालयाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे. मिलिंद देवरा हे काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर मुंबई दक्षिण मतदारसंघातून निवडून आले होते.

आमच्या नादाला लागू नका, ओबीसींच्या आरक्षणाचं महाभारत आम्हीच जिंकू; बीडच्या सभेत पडळकर गरजले

मिलिंद यांचे इंडस्ट्रीशी असलेले संबंधही चांगले मानले जातात. मिलिंद हे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जवळचे मानले जातात. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर आणि राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याची ऑफर दिल्यानंतर मिलिंद यांनी २०१९ मध्ये मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता. तेव्हा मिलिंद यांनी केंद्रीय पातळीवर पक्ष मजबूत व्हावा म्हणून राजीनामा देत असल्याचे सांगितले होते. मिलिंद गिटार उत्तम वाजवतात. काही प्रसंगी ते गिटार वाजवतानाही दिसले आहे.

मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडण्याची प्रमुख कारणं?
१) लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राज्यसभेवर पुनर्वसन होण्याची आशा होती. मात्र दोन वेळा पराभव झाल्यानंतरही मिलिंद देवरा यांचे पुनर्वसन करण्यात आले नाही. त्यामुळे मिलिंद देवरा नाराज होते.
२)मिलिंद देवरा यांनी महाविकास आघाडी मधून दक्षिण मुंबईच्या जागेवर दावा सांगितला होता. मात्र शिवसेना ठाकरे गट ही जागा सोडण्यास तयार नसल्याने मिलिंद देवरा यांची गोची झाली होती. त्यातच या जागेवर कोण उमेदवार द्यायचा याबाबत भाजपने चाचणी सुरू केली. त्यात राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र त्यानंतर मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर यांची तयारी मंदावली आणि अखेर या जागेसाठी मिलिंद देवरा यांचे नाव चर्चेत आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed