या सभेदरम्यान मनोज जरांगे यांनी गेल्या महिना दीड महिन्यात १४ ते १५ मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या. यापूर्वी देखील मराठा आरक्षणासाठी आत्महत्या झाल्या. त्यांच्या कुटुंबांना मराठा समाज काही कमी पडू देणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. मराठा समाजाचं दु:ख आणि वेदना सहन होत नाही त्यामुळं गावोगावी जाऊन मराठा माता भगिनींचे आशीर्वाद घेत आहे, असं जरांगे पाटील म्हणाले.
मराठा आरक्षणाचं आंदोलन शांततेच्या मार्गानं सुरु आहे. शांततेच्या मार्गानं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं हा शब्द आहे. त्या शब्दापासून मागं हटणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. मी शेतकऱ्याचा मुलगा असून शब्द दिला की त्यापासून मागं फिरत नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
माझ्या समाजाला आई बाप मानतो, समाजाशी गद्दारी करणार नाही. मी एकदा शब्द दिला की बदलत नाही. आपण मोर्चे खूप काढले, सभा घेतल्या पण घराघरातील लोकांनी आरक्षण समजून घेतलं नाही. मोर्चे काढले आणि सभा घेतल्या पण आरक्षण मिळालं नाही. आरक्षण समजून घेणं त्याच्या मुळाशी जाणं महत्त्वाचं होतं, असं मनोज जरांगे म्हणाले.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावेत या मागणीसाठी आंदोलन सुरु झालं. आपण कुणबी प्रमाणपत्राची मागणी केली आहे. मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का यावर काहीच उत्तर दिलं जात नाही. कुणबी या शब्दाचा सुधारित अर्थ शेती असा असल्याचं जरांगे म्हणाले.
Read Latest Maharashtra News And Marathi News
