• Thu. Mar 12th, 2026
    महाराष्ट्रात दोन महिने पावसाची बॅटिंग की उघडीप, IMD कडून अपडेट समोर

    म. टा. प्रतिनिधी, पुणे :मान्सूनच्या पूर्वार्धात (जून, जुलै) देशभरात सरासरीपेक्षा पाच टक्के पाऊस जास्त नोंदला गेला. उत्तरार्धात देशभरातील पावसाचे प्रमाण सर्वसाधारण श्रेणीत (सरासरीच्या ९४ ते १०६ टक्के) राहणार असले, तरी पर्जन्यमान दीर्घकालीन सरासरीपेक्षा काहीसे कमी राहू शकते, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) सोमवारी जाहीर केला. महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात आणि उर्वरित हंगामात पाऊस सरासरीखाली राहण्याची शक्यता अधिक असल्याचे या अंदाजात म्हटले आहे.

    ऑगस्ट महिना; तसेच उर्वरित मान्सून हंगामातील पावसाचा दीर्घकालीन अंदाज ‘आयएमडी’चे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत सोमवारी जाहीर केला. डॉ. महापात्रा म्हणाले, ‘देशभरात ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांत पावसाचे प्रमाण पूर्वार्धापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये देशभरातील पाऊस त्या महिन्याच्या सरासरीपेक्षा कमी राहू शकतो. या काळात महाराष्ट्रासह मध्य भारतातील पावसाचे प्रमाण कमी होईल, तर दुसरीकडे गंगेच्या खोऱ्यातील राज्यांमध्ये आणि हिमालयातील पावसाचे प्रमाण वाढेल.’

    ‘जूनमध्ये देशभरात सरासरीपेक्षा नऊ टक्के कमी पाऊस नोंदला गेला होता. जुलैमध्ये पावसाने कसर भरून काढली. जुलैमध्ये सरासरीपेक्षा १३ टक्के पाऊस जास्त झाल्याने हंगामात आतापर्यंत सरासरीपेक्षा पाच टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. यंदा जुलैमध्ये महाराष्ट्रातील कोकण आणि घाट क्षेत्र, गुजरात, तेलंगण, दिल्ली, हरियाणा या भागांमध्ये अतिजोरदार पावसाच्या १,११३ घटना, तर अतिवृष्टीच्या २०५ घटना नोंदल्या गेल्या. गेल्या पाच वर्षांतील या सर्वाधिक घटना आहेत,’ असेही डॉ. महापात्रा म्हणाले.
    विधानपरिषदेच्या १२ आमदार नियुक्तीबद्दल बाजू मांडा, उच्च न्यायालयाचे शिंदे सरकारला आदेश, नेमकं काय घडलं?

    पाच ऑगस्टपासून मान्सूनमध्ये ब्रेक

    मान्सूनचा मध्य भारतावरील पश्चिम- पूर्व कमी दाबाचा पट्टा (मान्सून ट्रफ) हिमालयाच्या पायथ्याकडे सरकण्याची शक्यता असून, येत्या पाच ऑगस्टपासून मान्सूनमध्ये ब्रेकची स्थिती निर्माण होऊ शकते. मान्सूनच्या उर्वरित हंगामात विदर्भात पाऊस सरासरीच्या वर राहण्याची शक्यता आणि उत्तर मध्य महाराष्ट्र व कोकणात पाऊस सरासरीखाली राहण्याची ३५ ते ४५ टक्के आहे. मराठवाड्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता ५५ ते ७५ टक्के आहे, असे ‘आयएमडी’च्या अंदाजात म्हटले आहे.
    Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर गर्डर कोसळून १४ जणांचा मृत्यू, मृतांची यादी समोर

    जुलैमधील मोठ्या पावसाची कारणे

    ‘प्रशांत महासागरात कमी तीव्रतेचा ‘एल निनो’ सक्रिय असूनही यंदाच्या मान्सूनच्या पूर्वार्धात त्याचा प्रतिकूल परिणाम झाला नाही,’ असे डॉ. महापात्रा यांनी नमूद केले. जुलैमध्ये बंगालच्या उपसागरावर चार कमी दाबाची क्षेत्रे तयार होऊन ती १४ दिवस सक्रिय राहिली. उत्तर भारतावर चार वेळा ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’चा प्रभाव राहिला. या स्थितीमुळे नैर्ऋत्य आणि पूर्व भारताचा काही भाग वगळता देशात बहुतेक ठिकाणी चांगला पाऊस झाला.

    Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गाचं काम सुरु असताना दुर्घटना, गर्डर बसवणारी क्रेन कोसळली,१४ जणांचा मृत्यू

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed