• Sat. Sep 21st, 2024

रात्री झोपले ते उठलेच नाहीत, दरवाजा तोडला आणि…;अखेर पती-पत्नीच्या मृत्यूचं गूढ उकललं

रात्री झोपले ते उठलेच नाहीत, दरवाजा तोडला आणि…;अखेर पती-पत्नीच्या मृत्यूचं गूढ उकललं

बीड : तालुक्यातील नाळवंडी गावात गुरुवारी सकाळी एका पती-पत्नीचा मृतदेह दोन वेगळ्या रूममध्ये आढळून आला होता. पती-पत्नीचा नेमकी आत्महत्या झालेली की घातपात असा संशय पोलिसासह नागरिकांनीही वर्तवला होता. अखेर या पती-पत्नीच्या मृत्यू मागचं गूढ उघडकीस आलं आहे.पतीनेच पत्नीचा खून करून स्वतःचं आयुष्य संपल्याचं पोलिसांच्या तपासात पुढे आलं आहे. यामुळे गावासह जिल्ह्यात या घटनेने खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी मध्यरात्री या दांपत्याने आपल्या दोन मुलांसह आनंदात जेवण केलं. त्यानंतर कुशवर्ता म्हेत्रे यांनी आपल्या दोन मुलांना शेंगाही भाजून खायला दिल्या. त्यानंतर दोन्ही मुलं अभ्यासासाठी दुसऱ्या रूममध्ये गेली. रात्री पती-पत्नी जेवण आटपून आपल्या रूममध्ये झोपण्यास गेले, मात्र सकाळी आठ वाजले तरी घरचा दरवाजा उघडला नाही.

मास्टरमाइंड पोलीस; गुन्हेगारांचा अचूक छडा लावणारे अजय जाधव यांचा सन्मान होणार

सकाळी पाचलाच उठणारी आई आज आठ वाजले तरी उठली नाही, हे बघून दोन्ही मुलांनी दरवाजा वाजवण्यास सुरुवात केली. मात्र रुममधून कोणताच आवाज आला नाही. त्यानंतर दोन्ही मुलांनी आपल्या काकांना यांना या गोष्टीची माहिती दिली. त्यानंतर त्या रुमकडे धाव घेतली. बराच वेळ दरवाजा वाजून देखील हे दांपत्य दरवाजा उघडत नसल्याने आजूबाजूच्या दोन-तीन जणांच्या साहाय्याने हा दरवाजा तोडण्यात आला. मात्र दरवाजा तोडल्यानंतर रुममधील दृश्य पाहून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली.

पल्लवीनं तीन गोष्टी सांगितल्या,मुंबईत शोधाशोध, अखेर घरं सापडलं अन् बहिणींशी गळाभेट,९ वर्षांचा दुरावा संपला
त्या रुममध्ये पत्नीचा मृतदेह पडलेला, तर दुसऱ्या ठिकाणी पतीचा एका बाजूला दोरीला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. या घटनेची माहिती तात्काळ पिंपळनेर पोलिसांना देण्यात आली. पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला, मात्र दोघांचा मृत्यू कसा झाला यामागचं गूढ कायमच होतं.

म्हेत्रे दांपत्याला दोन विवाहित मुली आणि दोन अविवाहित मुलं असं हे कुटुंब होतं. मात्र पोलिसांना हा घातपात आहे की आत्महत्या याचं गूढ उकलत नव्हतं. मात्र पोलिसांनी तपास केल्यानंतर या मृत्यूमागचं गूढ उकललं आहे.

आई नातवाचा निकाल आणायला शाळेत गेली, घरात येऊन पाहते तर धक्काच बसला, एकुलता एक लेक…
रात्री झोपायला गेल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. वादादरम्यान पतीने आपल्या पत्नीचा गळा मोबाइल चार्जरच्या वायरने आवळून तिला संपवलं. त्यानंतर घरातच असलेल्या एका दोरीने स्वतः गळफास घेतला. या घटनेचं गूढ उकलल्यानंतर एकच खळबळ उडाली. अत्यंत मनमिळावू, कधीही भांडणात नसलेलं, कधीही घरात वाद नसायचा असं हे कुटुंब होतं. मात्र त्यारात्री घडलेल्या या प्रकाराने परिसरातील सर्वांनाच मोठा धक्का बसला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed