स्वराज याच्यावर या अगोदर पोलिसांत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला होता. नुकतीच त्याची कारागृहातून सुटका झाली होती. स्वराज हा बार्शीटाकळीतील एका महाविद्यालयात बी.कॉम प्रथम वर्षाला शिकत होता. स्वराज आईवडिलांना एकटाच मुलगा होता. त्याच्या आत्महत्येमुळे हगवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दोन पानांच्या नोटमध्ये म्हटले आहे की…
स्वराजनं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या नोट मध्ये म्हटलं आहे की आयुष्यात ‘मी’ अशा चुका केल्या आहेत की त्यामुळे माझ्या आई-वडिलांना मित्रांना गावातील लोकांना खूप त्रास सहन करावा लागला. त्यामुळं पश्चात्ताप म्हणून आज टोकाचं पाऊल उचलत आहे, माझ्यावर दाखल असलेला गुह्यात ‘मी’ मुख्य आरोपी असून तरीही याचा दोष माझ्या आई-वडिलांना मित्रांना देऊ नका. अशी माझी पोलीस प्रशासनाला विनंती असून लवकरात लवकर न्याय मिळावा. तक्रार करणाऱ्या फिर्यादीने मला व मित्राला फसविले आहे. तसेच फिर्यादी सोबत माझी जी काही स्टोरी घडली आहे, ते मी आणि बाहेरील गावातील मुलांनी केले आहे. परंतु कारण नसतानाही चांगल्या मुलांना या प्रकरणात फसवलं गेलं. आत्महत्या या कारणासाठी करतो आहे की माझ्यावर गुन्हे दाखल झाले असून कारागृहातून सुटून आल्यापासून मला कोणीही चांगलं म्हटलं नाही सर्वांनी शिव्या दिल्यात, तसेच इतर गोष्टींचाही अनुभव आला. या प्रकरणानंतर आई-वडिलांची गावात खूप इज्जत गेली, तसेच माझी प्रेमिका हिला सुद्धा धोका दिला.
एवढं सारं झालं असल्यावर तिच्यासोबत बोललो तिला फसवलं, बाकी काही गोष्टी तिच्यासोबत केल्या असल्यामुळं मला जीवन संपावं लागत आहे. माझ्या प्रेमिकेला कोणीही त्रास देऊ नये. माझ्या प्रेमिका सोबत बोलत असताना तिने मला म्हटलं होतं जेव्हा पर्यंत स्वराज तू आहे तेव्हापर्यंत मी परंतु तिनेही यानंतर असा कुठला प्रकार करू नये, त्यामुळे तिच्या घरच्यांनी तिच्यावर लक्ष ठेवावे, अशी विनंती ही स्वराजनं केली आहे.
घाईगडबडीत कर्ज हवं म्हणून अॅपवरून पैसे घेताय? थांबा ! लोन अॅप घोटाळा समजून घ्या