Maharashtra Politics : शिवसेनेकडे परिवहन विभाग असताना रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट एका वर्षाची मुदतवाढ दिल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उघड नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : शिवसेनेच्या मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांच्या कारभारात गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री कार्यालयाकडून हस्तक्षेप होत असल्याच्या दबक्या आवाजातील चर्चेला शुक्रवारी जाहीर नाराजीचे स्वरुप मिळाल्याचे समजते. शिवसेनेकडे परिवहन विभाग असताना रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट एका वर्षाची मुदतवाढ दिल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांनी पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उघड नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे.
सीएमओकडून थेट नियंत्रण
शिवसेनेच्या मंत्र्यांकडे असलेल्या महत्त्वाच्या विभागांमधील धोरणात्मक निर्णय असोत किंवा प्रशासकीय बदल्या, अनेक गोष्टींवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून थेट नियंत्रण ठेवले जात असल्याचा आरोप अधून-मधून दबक्या आवाजात शिवसेनेच्या मंत्र्याकडून केला जात होता. मंत्र्यांना स्वतंत्रपणे काम करू दिले जात नाही आणि त्यांच्या खात्यांच्या निर्णयांवर मुख्यमंत्री कार्यालयाचा दबाव असतो, अशी उद्विग्नता शिवसेनेच्या गोटातून व्यक्त केली जात होती. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही पक्षांतील संबंध ताणले गेल्याचे चित्र दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर, गुरुवारी परप्रांतीय रिक्षाचालकांना मराठी भाषा बोलणे अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांकडून मोठा निर्णय घेण्यात आला. शिवसेनेच्या परिवहन मंत्र्यांनी किंवा संबंधित विभागाने घेतलेल्या भूमिकेला बगल देत, मुख्यमंत्र्यांनी रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी एका वर्षाची मुदतवाढ जाहीर केली. या निर्णयाद्वारे मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर कुरघोडी केली. त्यावरून शुक्रवारी शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना फोन करून नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
शिवसेनेच्या मंत्र्यांची स्पष्ट नाराजी
काही मंत्र्यांनी तर थेट भेट घेत नाराजीला वाट मोकळी करून दिल्याचे समजते. युतीतील तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीची बैठक झाली होती. त्यात ‘युतीधर्मा’चे पालन आणि समन्वयाने काम करण्यावर चर्चा झाली होती. मात्र, परिवहन मंत्र्यांना विश्वासात न घेता मुख्यमंत्र्यांनी निर्णय जाहीर केल्याने या समन्वयालाच फाटा दिल्याची चर्चा शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये रंगली आहे.
दोनच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नंदनवन निवासस्थानी मुंबई महापालिका पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला होता. या वेळी त्यांनी महापौरपदाबाबत माहिती दिली होती. मुंबईचे महापौरपद सध्या भाजपकडे असल्याबाबत उपमुख्यमंत्र्यांना विचारले असता, भाजप आणि आमच्यात यापूर्वीच चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले होते. अडीच वर्षांनंतर पुढील सव्वा वर्ष शिवसेनेचा महापौर असेल, असे शिंदेंनी स्पष्ट केले होते. सध्या अडीच वर्षांसाठी महापौरपद भाजपकडे असून, पुढील अडीच वर्षापैकी सव्वा वर्ष महापौरपद शिवसेनेला, तर त्यानंतरचे सव्वा वर्ष पद पुन्हा भाजपकडे असेल, असे शिंदेंनी स्पष्ट केले होते.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा