• Fri. Aug 28th, 2026

Sugar Stock Limit: साखरेच्या साठेबाजांवर नजर, कृत्रिम टंचाईला आळा घालण्यासाठी 30 दिवसांपेक्षा अधिक साठवणुकीवर बंदी

Maharashtra Sugar Stock Limit: साखर विक्रेते आणि वितरकांना कोणत्याही वेळी चार हजार क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा करता येणार नाही; तसेच खरेदी केल्यानंतर ३० दिवसांपेक्षा अधिक काळ साखर साठवून ठेवण्यासही मनाई करण्यात आली आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : साखरेची साठेबाजी आणि कृत्रिम टंचाईला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या साठा निर्बंधांची राज्यात काटेकोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. साखर कारखाने, वितरक, व्यापारी; तसेच मोठ्या ग्राहकांकडील साठ्याची प्रत्यक्ष तपासणी करण्यासाठी गुरुवारपासून राज्यभर विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

केंद्र सरकारने २८ जुलै २०२६ रोजी प्रसृत केलेल्या अधिसूचनेनुसार हे निर्बंध एक ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर या कालावधीत लागू राहणार आहेत. त्यानंतर १९ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आलेल्या स्वतंत्र अधिसूचनेद्वारे दरमहा उत्पादन, वापर किंवा कच्चा माल म्हणून १० टनांपेक्षा अधिक साखर वापरणाऱ्या मोठ्या ग्राहकांनाही साठा मर्यादा लागू करण्यात आली आहे. अशा ग्राहकांना साखर प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांपेक्षा अधिक काळ तिचा साठा करता येणार नाही.

Maharashtra TimesTukaram Mundhe : पाच मित्र रेस्टॉरंटमध्ये बसले, वेटरला एकच प्रश्न विचारला, तोच तुकाराम मुंढेंचं दर्शन घडलं, व्हिडिओला नेटिझन्सची पसंतीसाखर विक्रेते, वितरक आणि संबंधित मोठ्या ग्राहकांना अन्नसाठा देखरेख पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यावर सध्याच्या साखर साठ्याची माहिती भरावी लागणार असून, त्यानंतर दर शुक्रवारी साठ्याची स्थिती अद्ययावत करावी लागणार आहे. साखरेच्या साठ्याची पडताळणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष तपासणी पथके स्थापन करण्यात आली आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी या पथकाचे अध्यक्ष असतील. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था; साखर आयुक्त कार्यालयाचा संबंधित जिल्ह्यातील प्रतिनिधी; वैधमापनशास्त्र निरीक्षक आणि पोलिस अधीक्षक किंवा पोलिस निरीक्षक दर्जाचा अधिकारी हे पथकाचे सदस्य असतील. मुंबई आणि ठाणे परिमंडळासाठी नियंत्रक, शिधावाटप; तसेच संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांच्या स्तरावर स्वतंत्र विशेष पथके स्थापन केली जाणार आहेत. याशिवाय राज्यस्तरीय दक्षता पथकांकडूनही साखरेच्या साठ्यांची तपासणी केली जाणार आहे.

तपासणी पथके व्यापारी आणि वितरकांच्या गोदामांना प्रत्यक्ष भेट देऊन साखरेच्या पोत्यांची मोजणी करणार आहेत. या वेळी प्रत्यक्ष उपलब्ध साठ्याची साठा नोंदवही, खरेदी-विक्रीच्या नोंदी, खरेदी पावत्या, गेट पास, वाहतूक व पाठवणीची कागदपत्रे तसेच अन्नसाठा देखरेख पोर्टलवर जाहीर केलेल्या साठ्याशी पडताळणी केली जाणार आहे. साखर कारखान्यांकडून मोठ्या ग्राहकांना थेट किंवा पुरवठादारांमार्फत करण्यात आलेल्या मासिक साखर विक्रीचीही तपासणी केली जाणार आहे.

Maharashtra TimesSamay Raina : सर, मी एक बिस्किट घेऊ का? फडणवीसांकडून सन्मान घेतानाही समय रैनाचा मिश्कीलपणा; म्हणाला महाराष्ट्र सायबर सेल ग्रेट, कुठूनही शोधून काढतीलतफावत आढळल्यास कारवाई

पोर्टलवर जाहीर केलेला साठा आणि गोदामातील प्रत्यक्ष साठा यामध्ये तफावत आढळल्यास त्याची नोंद तपासणी अहवालात केली जाणार आहे. यासाठी साठ्याची छायाचित्रे, साठा नोंदवही आणि संबंधित कागदपत्रांसह आवश्यक पुरावे संकलित केले जातील. साठा निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. ही तपासणी व कारवाई ३० नोव्हेंबरपर्यंत किंवा त्यापूर्वी संबंधित परिपत्रकानुसार लागू राहणार आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा