Khawdya Dongar Case Kunal Aunty Kalyani Parde Reaction : छत्रपती संभाजीनगर येथील तिसगाव परिसरात असणाऱ्या खवड्या डोंगरावरुन खाली पडून एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला होता.
’पप्पा तुम्ही मला सोडून कसे जाऊ शकतात?’
मावशीने दिलेल्या माहितीनुसार, ‘संवादाच्या अभावामुळे आणि वाढत्या गैरसमजांमुळे कुणालचे वडील घर सोडून निघून गेले होते. त्यामुळे त्याची तो आणि आई तणावात होती. कुणालला जीव द्यायचा नव्हता. त्यांनी वडिलांना कॉल केला होता. तेव्हा तो म्हणाला, ‘पप्पा तुम्ही मला सोडून कसे जाऊ शकतात?, माझ्याकडे परत या’, असं म्हणाला. ‘कुणालला आई-वडिलांना एकत्र आणायचं होतं, त्यासाठी बाहेर गेलेल्या वडिलांना इमोशनल करण्यासाठी तो डोंगरावर गेला होता. आई-वडिलांचे वाद थांबवण्यासाठीच तो ही धडपड करत होता’, असंही परडे यांनी स्पष्ट केलं आहे.
Pune News : ‘श्यामाप्रसाद मुखर्जींवर 10 मिनिटे बोला’; अमोल बालवडकरांनी विरोधकांना कोंडीत पकडलं, भाजप नगरसेवकांची बोबडी वळली, पुणे पालिकेत काय घडलं?
आयफोन अन् श्रीमंतीच्या चर्चांवर स्पष्टीकरण
भाऊजींच्या व्यवसायावरून आणि आयफोन वापरण्यावरूनहोणाऱ्या उलट-सुलट चर्चांवर कुणालच्या मावशीने कडक शब्दात उत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या की, ‘भाऊजी ड्रायव्हर असले तरी ते चांगल्या शेतकरी कुटुंबातील आहेत. घरात नोकरीसोबतच शेतीचा पैसा येत होता, त्यामुळे कुटुंबात पैशांची कोणतीही कमतरता नव्हती. तसेच आयफोन आता अगदी सहज आणि स्वस्तात मिळतात. जुने फोन 20-25 हजारात मिळतात. कुणालला शिक्षणासाठी मोबाईल घेऊन दिला होता, त्यामुळे यावरून श्रीमंतीचा किंवा उधळपट्टीचा आव आणणं चुकीचं’, असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
…यामुळे बहिणीने मीडियावर व्यक्त केलं मत
कुटुंबातील वादावर बोलताना मावशीनं स्पष्ट केलं की, ‘माझ्या बहिणीच्या लग्नाला 22 ते 23 वर्ष झाली होती. तिचा मोठा मुलगा आज 21 वर्षांचा असता, तर कुणाल 18 वर्षांचा होता. इतकी वर्ष संसार केल्यानंतर पतीकडून स्वतःचा हक्क मागण्याचा आणि मत मांडण्याचा प्रत्येक पत्नीला अधिकार असतो. घरात कोणाशीही संवाद होत नसल्यामुळेच तिने सोशल मीडियावर आपलं मत व्यक्त केलं होतं.
Tukaram Mundhe : पाच मित्र रेस्टॉरंटमध्ये बसले, वेटरला एकच प्रश्न विचारला, तोच तुकाराम मुंढेंचं दर्शन घडलं, व्हिडिओला नेटिझन्सची पसंती
2025 च्या प्रसंगाचा उलगडा
कुणाल यापूर्वी 2025 मध्येही डोंगरावर गेल्याच्या चर्चेवर मावशीने स्पष्टीकरण दिलं आहे. ‘कुणाल तेव्हा आत्महत्या करायला गेला नव्हता. तो नैराश्यात असल्यानं केवळ फिरण्यासाठी गेला होता. त्याने आईला मेसेज करून ‘मम्मी, मी थोडा परेशान आहे, मला स्पेस हवी आहे, मी संध्याकाळी परत येईन’ असं कळवलं होतं. मात्र, आईने तो मेसेज वेळेवर न पाहिल्यानं त्यावेळी पोलिसांत धाव घेण्यात आली होती’, असं मावशीने सांगितलं. कौटुंबिक वाद, संवादाचा अभाव आणि वडिलांना परत आणण्याच्या एका 18 वर्षांच्या मुलाच्या भाबड्या धडपडीतून हा संपूर्ण अनर्थ घडल्याचं मावशीच्या या दाव्यावरुन स्पष्ट होत आहे.
