• Mon. Aug 24th, 2026

Pune Satara Highway: पुणे – सातारा महामार्गावरील कापूरहोळ येथे रविवारी ‘रास्ता रोको’करण्यात आला. ७६५ केव्ही क्षमतेच्या टॉवर लाइन विरोधात हे आंदोलन होत. हे आंदोलन चार तास चालू होत.मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकीच्या आश्वासनानंतर आंदोलनाला स्थगिती देण्यात आली.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.वृत्तसेवा,भोर: पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ येथे रविवारी ‘ रास्ता रोको ’ करण्यात आला. भोर तालुक्यातील भोंगवलीतील प्रस्तावित ७६५ केव्ही क्षमतेच्या टॉवर लाइन उपकेंद्राच्या विरोधात हा रस्ता अडवण्यात आला. जवळपास चार तास हे आंदोलन चालले.

आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले

मात्र, येत्या गुरुवारी (दि. २७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाने दिल्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले, अशी माहिती भोर, राजगड संघर्ष कृती समितीचे निमंत्रक माजी आमदार संग्राम थोपटे यांनी दिली. या वेळी खासदार सुप्रिया सुळे , सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला

सकाळी सहा हजार लोकांचा समुदाय ट्रॅक्टर, बैलगाड्यांसह जमा होऊ लागला. त्यामुळे महामार्गावरील पुणे व सातारा बाजूकडे चार किलोमीटर लांब आणि सासवड, भोर बाजूकडे दोन किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कार्यकर्त्यांनी या प्रकल्पाविरोधात घोषणा देऊन ‘अटक केलेल्या लोकांना तत्काळ मुक्त करा,’ अशा जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

संदीपसिंह गिल यांच आंदोलकांना शांततेच आवाहन

पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल हे आंदोलकांना शांततेचे आवाहन करीत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकीच्या आयोजनाचे पत्र समितीला मिळाले. त्यानंतर सर्वांशी चर्चा करून आंदोलन तात्परते स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

योग्य निर्णय झाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र

मुख्यमंत्र्याच्या बैठकीत योग्य निर्णय झाला नाही, तर पुन्हा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही समितीने दिला. पोलिसांचा मोठा फौजफाटा आंदोलनस्थळी होता.

Maharashtra TimesNagpur News: ३० दिवसांत १ हजार कोटींचे वसुलीलक्ष्य ;उत्कृष्ट कामगिरी तर होणार गौरव,कामात हलगर्जीपणा तर होणार कारवाई, कर्मचाऱ्यांना दिला अलर्ट

विरोध कशासाठी?

दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांनी भाटघर, नीरा देवघर, गुंजवणी, वीर धरणासह महामार्गाचे विस्तारीकरण, रिंग रोड व प्रकल्पासाठी २६ एकर जमीन दिल्याचा दावा केला. या प्रकल्पामुळे भोरमधील ७१ आणि राजगड येथील ४५ गावे बाधित होणार आहेत. स्थानिक व लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता प्रकल्पाचे काम सुरू केले.

म्हणून विरोध होत आहे

भोंगवली परिसरात ८० एकर जमिनीत विनापरवानगी उत्खनन करण्यात आले; तसेच पाणी बंधाऱ्याचे सपाटीकरण, वृक्षतोड केली आहे. प्रकल्पामुळे हजारो एकर बाधित होणार आहे. हायव्होल्टेज वीज प्रवाहाची शेतकऱ्यांमध्ये भीती आहे. वीज वाहिन्यांच्या परिसरात जमीन व इतर वापरांवर बंधनाची शक्यता आहे. प्रातांधिकारी, तहसीलदार, पोलिस प्रशासनाकडून कोणतेही सहकार्य मिळत नाही. यामुळे हा विरोध होत आहे.

Maharashtra TimesAir Ticket Prices: विमानतिकिटाच्या दरांची गगनाला गवसणी ;सणासुदीच्या काळातील हवाई प्रवास खिशाला कात्री लावणारा

नाराजी व्यक्त

हजारो शेतकरी, अनेक नेत्यांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन सुरू असताना आमदार शकर मांडेकरांची गैरहजेरी तीव्रतेने जाणवली. अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा