Maharashtra Rain Update: हवामान विभागाने १३ जुलै रोजी महाराष्ट्र, यूपी, बिहारसह देशातील १७ राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट जारी केला आहे. या काळात ८० ते ८५ किमी वेगाने वादळी वारे वाहतील. महाराष्ट्रातील नाशिक, रत्नागिरीसह विदर्भ-मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: देशात मान्सूनचा जोर ओसरल्याची चिन्हे दिसत असतानाच आता हवामान विभागाने (IMD) नागरिकांची चिंता वाढवणारा मोठा इशारा दिला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रासह अनेक भागांत पावसाने उघडीप दिली असली, तरी उद्या म्हणजेच सोमवारी १३ जुलै रोजी देशातील तब्बल १७ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर-पूर्व बिहार आणि उत्तर-पूर्व आसामच्या परिसरात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे हा मान्सूनचा वेग तीव्र झाला आहे.
८५ किमी वेगाने वादळ, झाडे उन्मळून पडण्याची इशारा
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उद्या उत्तर प्रदेश आणि बिहारसह देशातील १७ राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. या पावसासोबतच ८० ते ८५ किलोमीटर प्रति तास या अत्यंत वादळी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या प्रचंड वेगामुळे मोठे वृक्ष मुळापासून उन्मळून पडू शकतात, असा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय पूर्व भारतातील राज्यांमध्ये वीज पडण्याची आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. डोंगर आणि पर्वतीय भागांत हवामान आणखी खराब होणार असल्याने पर्यटकांना आणि नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
देशातील ‘या’ १७ राज्यांमध्ये हाय अलर्ट
उद्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि आसाम यांचा समावेश आहे.
Tukaram Mundhe News : राजकीय नेत्यांसाठी हे नेहमीचं, पण सरकारी अधिकाऱ्यासाठी विरळ; तुकाराम मुंढेंसाठी गावकऱ्यांनी केलं तरी काय?
महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांत वाढणार जोर
काही दिवसांपूर्वी झालेल्या धुवांधार पावसामुळे राज्यातील धरणांचा जलसाठा वाढला असला, तरी काही गावांना पुराचा वेढा पडल्याने मोठे नुकसान झाले होते. सध्या पावसाने विश्रांती घेतली असली, तरी सोमवारपासून (१३ जुलै) राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे.
मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही विभागांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील धुळे, नंदूरबार, रत्नागिरी आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये उद्या जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा