Devendra Fadnavis: दिल्लीच्या राजकारणात जाण्याच्या चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच भाष्य केले. नेमकं काय म्हणाले?
शहरात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी कर्जमाफी, विदर्भातील पावसाची परिस्थिती, बोगस सोयाबीन बियाणे आणि नागपुरातील ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटरबाबत माहिती दिली. फडणवीस म्हणाले, ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात देशातील सर्वात मोठे ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर उभारले जात आहे. यामुळे नागपूरला कन्व्हेन्शन हब म्हणून नवी ओळख मिळेल. शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण, प्रदर्शन आणि संवाद मेळावे येथे आयोजित केले जातील.’
Maharashtra ATS Raid: पाकिस्तानी टोळीशी संपर्क; विदर्भातील 10 युवक एटीएसच्या ताब्यात, पाच जिल्ह्यांत मोठी कारवाई
कर्जमाफीबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी, ‘यापूर्वीच्या कोणत्याही योजनेत न समाविष्ट झालेल्या शेतकऱ्यांनाही लाभ देण्यात आल्याने ही राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी ठरेल’, असा दावा केला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या कौतुकाबद्दल आभार मानत त्यांनी एटीएसच्या मोठ्या कारवाईबाबत लवकरच सविस्तर माहिती देण्याचे सांगितले. बोगस सोयाबीन बियाण्यांच्या प्रकरणात ५ हजार नमुन्यांपैकी ३०० नमुने निकृष्ट आढळल्याने संबंधितांवर परवाना रद्द करण्यापासून फौजदारी कारवाईही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
२०३४पर्यंत फडणवीसच
देवेंद्र फडणवीस हे इन्फ्रामॅन आहेत. २०३४पर्यंत तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असावेत ही राज्याच्या १४ कोटी जनतेची इच्छा आहे’, असे मत महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. सध्या अफवांचा बाजार गरम आहे. अफवा बिनबुडाच्या आहेत असेही ते म्हणाले.
Devendra Fadnavis | विदर्भातील 10 युवक एटीएसच्या ताब्यात, मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाची अपडेट
भाजपने राज्याची धुरा शिंदेंकडे द्यावी- बच्चू कडू
देवेंद्र फडणवीस हे केंद्रात गेल्यास चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होतील, असे वक्तव्य शिवसेनेचे (उबाठा) नेते संजय राऊत यांनी केले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी २०२२मध्ये उठाव केला नसता तर आज भाजप सत्तेत नसता. त्यामुळे फडणवीस केंद्रात गेल्यास नैतिकतेच्या आधारावर भाजपने राज्याची धुरा शिंदेंकडे द्यावी, असे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
