• Tue. Jul 7th, 2026
    अतिवृष्टीचा एसटी प्रवाशांना फटका, मुंबई-पुणे शिवनेरीच्या फेऱ्या पुढील सूचनेपर्यंत रद्द, महामंडळाचा मोठा निर्णय

    Mumbai Pune ST Shivneri Bus : अतिवृष्टीमुळे मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याने सर्वच वाहतूक बंद झाल्याने त्याचा परिणाम शिवनेरीवर झाला असून पुढील सूचना मिळेपर्यंत ही सेवा बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. खास प्रतिनिधी, पुणे : मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याने राज्य परिवहन महामंडळाची प्रीमियम समजली जाणारी मुंबई-पुणे दरम्यान धावणारी शिवनेरी पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. मुंबई-कोकणासह राज्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका एसटी प्रवाशांना बसला आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यात एसटीच्या ७,८२० फेऱ्या रद्द झाल्या आहेत.

    वाहतूक बंद, शिवनेरीला फटका

    मुंबई-पुणे हे अंतर चार तासांत पूर्ण करणारी वातानुकूलित सेवा अशी एसटीच्या शिवनेरीची ओळख आहे. यामुळे साध्या एसटीपेक्षा शिवनेरीचे प्रवास भाडेही अधिक आहे. अतिवृष्टीमुळे मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याने सर्वच वाहतूक बंद झाल्याने त्याचा परिणाम शिवनेरीवर झाला. सोमवारी सकाळी ९ वाजता दादरवरून औंधमार्गे पुणे शिवनेरी रवाना झाली. त्यानंतर एकही शिवनेरी पुण्यासाठी रवाना झाली नाही. पुण्याहून सोमवारी सकाळी सात वाजता निघालेली शिवनेरी दुपारी चार वाजता दादरमध्ये दाखल झाली.

    पुढील सूचनेपर्यंत शिवनेरी फेऱ्या रद्द

    एरव्ही चार तासांत पोहोचणाऱ्या शिवनेरीला दादरमध्ये येण्यासाठी आठ तासांचा वेळ लागला. प्रवासी गैरसोय टाळण्यासाठी मिसिंग लिंक आणि मुंबई-पुणे रस्तेमार्ग पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत शिवनेरीच्या फेऱ्या रद्द राहणार आहेत, असे एसटी अधिकाऱ्यांनी सांगितले.
    Maharashtra TimesMumbai Crime : आई फोन का नाही उचलत! लेकीची चिंता वाढली, नातेवाईकांनी पवार कुटुंबाचं दार तोडलं, घरात भयंकर दृश्य, २३ वर्षांचा शेजारी अटक

    रायगड विभागातील अनेक फेऱ्या रद्द

    सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड विभागातील महाड, अलिबाग, पेण, श्रीवर्धन, कर्जत, रोहा, मुरुड, माणगाव या आगारांतील एकूण ७३७ एसटी फेऱ्या आणि दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, देवरूख, रत्नागिरी, लांजा, राजापूर, मंडणगड यांच्या एकूण ६८० फेऱ्या रद्द करण्यात आल्या.

    Missing Link वर दरड कोसळली, Supriya Sule यांनी फडणवीसांना ‘त्या’ वक्तव्याची करून दिली आठवण

    कारवाईच्या धास्तीने कर्मचाऱ्यांत भीती

    दुसरीकडडे, राज्य मार्ग परिवहन महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई झाल्याने आता वाहक, चालकांसह कर्मचारीही धास्तावले आहेत. कर्मचारी किंवा वर्ग दोन अधिकाऱ्यांच्या स्तरावरील दुर्लक्षाची शिक्षा वरिष्ठांना भोगावी लागल्याचा संदेश या कारवाईतून सर्वदूर पसरला आहे. त्यामुळे राज्यभरातील कमर्चाऱ्यांना छोट्या-छोट्या गोष्टींसाठी यापुढील काळात धारेवर धरले जाण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

    राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिकमधील अकरा अधिकाऱ्यांवर गेल्या आठवड्यात निलंबनाची कारवाई करण्यात आली. विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांसह आगार प्रमुखांपर्यंतच्या वेगवेगळ्या पदांवरील अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. हलगर्जीपणा, आर्थिक नुकसानीसह महामंडळाची प्रतिमा मलीन करण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे.
    Maharashtra TimesSiya Goyal : केतन आपल्याला वरुन पाहतोय, खंबीर राहा; सियाचा ‘सासऱ्यांना’ धीर, जेलमध्ये जाण्याची पूर्वतयारी, सर्च हिस्ट्रीत भांडाफोड

    कारवाई मागे घ्यावी, सरनाईकांना निवेदन

    आगार व्यवस्थापकांच्या अख्त्यारितील कामांमध्ये राहिलेल्या त्रुटींकरिता थेट प्रादेशिक अभियंता, यंत्र अभियंता, लेखा अधिकारी, विभागीय भांडार अधिकारी, विभागीय कर्मवर्ग अधिकारी, विभागीय अभियंत्यांसारख्या वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. केवळ नाशिकमध्येच नाही, तर यापूर्वी रायगड, सातारा, जळगाव, कणकवलीतही काही अधिकारी निलंबित झाले. या अधिकाऱ्यांवर अन्याय झाल्याची कर्मचाऱ्यांचीही भावना असून, कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी बहुजन परिवहन अधिकारी, कर्मचारी संघटनेने परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन देऊन केली आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा