राज्यात सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष या अधिवेशनाकडे लागले आहे. विशेष म्हणजे कर्जमाफी आणि इतर शेतीविषयक मदतीसाठी शेतकऱ्यांना या अधिवेशनातून मोठ्या अपेक्षा आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणाऱ्या रकमेबाबत ३० जून ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र काही प्रशासकीय अडचणी आणि तांत्रिक कारणांमुळे ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही, अशी माहिती देण्यात आली आहे. याच संदर्भात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.