शिवसेना पक्षाचा ६० वा वर्धापन दिन मुंबईतील षण्मुखानंद सभागृह पार पडत आहे. सहा खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेय. ठाकरेंच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात कवी नितीन चंदनशिवेंनी जोरदार बॅटिंग केली. यावेळी नितीन चंदनशिवेंनी ‘ऑपरेशन तुडवा’वरून जोरदार कविता सादर केली. गेलेले परत येतील, पण त्यांना अजिबात घेऊ नका, असे आवाहन त्यांनी ठाकरेंना केले. चंदनशिवेंच्या भाषणाला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह सर्वांनी टाळ्यांचा प्रतिसाद दिला.