सोलापूरच्या राजकरणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. सोलापूरची विधान परिषद निवडणूक ही प्रतिष्ठेची बनली आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूने निवडणुकीत आपला उमेदवार निवडून यावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. असं असताना आज सोलापुरात आज अनपेक्षित भेट बघायला मिळाली आहे. या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सोलापूर : विधान परीषद निवडणुकीचा प्रचार शिगेला असताना नवीनच ट्विस्ट समोर आला आहे. सोमवारी दुपारी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी महायुतीच्या शिवसेना खासदार ज्योती वाघमारे यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच, महायुतीच्या गोटात अस्वस्था पसरली. शिवसेना खासदार ज्योती वाघमारे यांनी ताबडतोब याबाबत खुलासा केला आहे. भारतीय संस्कृतीप्रमाणे एखादा पाहून घरी आला तर त्याचे स्वागत करावे लागते. मात्र आम्ही महायुतीचा धर्म पाळणार. विधान परिषद निवडणुकीत राज्यातील महायुती सर्व जागा जिंकेल, असा विश्वास ज्योती वाघमारे यांनी बोलून दाखवला आहे.
विधान परिषदांचं उमेदवारांनी भेटीगाठी घेत लावला जोर
सोलापुरात विधान परिषद निवडणुकीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. सोलापूर विधान परिषदेची जागा विजयी होण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीत जोरदार ताकद लावली जात आहे. महायुतीकडून बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून वसंत देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे राजेंद्र राऊत विरुद्ध वसंत देशमुख असा सामना रंगला आहे.
या निवडणुकीत स्वतः पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लक्ष घातले आहे. तर महाविकास आघाडीच्या वसंत देशमुखांसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे मैदानात उतरले आहेत. वसंत देशमुख आणि राजेंद्र राऊत आपापल्या नेत्यांच्या आणि मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीकडे बारकाईने पाहिले असता, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील असाच सामना सुरू आहे की काय? असे चित्र निर्माण झाले आहे.
‘मुंगेरी लाल के हसीन सपने’; ज्योती वाघमारेंनी लगावला टोला
महाविकास आघाडीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, उमेदवार वसंत देशमुखांनी शिंदे गटाच्या खासदार ज्योती वाघमारेंची भेट घेतल्यानंतर भेटीचे फोटो व्हायरल झाले आहेत. राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चाना उधाण आले आहे. दरम्यान या भेटीबाबत खासदार ज्योती वाघमारे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांवर टीका करत सर्व चर्चा फेटाळल्या आहेत. सोलापूरसह राज्यभरातील 17 च्या 17 जागा महायुतीच जिंकेल यात शंका नाही, असा विश्वास ज्योती वाघमारे यांनी व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडीकडे अदृश्य शक्ती असल्याचा दावा करणे म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने या पद्धतीने बघावे लागेल, असा टोला ज्योती वाघमारे यांनी लगावला. “सोलापूरसह राज्यातील सर्वच महायुतीचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडीचे काय झाले हे सर्वांनी पाहिले. आताच्या विधान परिषद निवडणुकीत अनेक ठिकाणी महाविकास आघाडीला स्वतःचा उमेदवारही देता आला नाही. किंबहुना जे उमेदवार दिले त्यांनी ऐनवेळेला पळ काढला. लोकसभेला संविधान बदलणार असा फेक नरेटीव पसरवून यश मिळवले. त्या यशाच्या बळावर त्यांनी अशा वल्गना करू नये. लवकरच दूध का दूध पाणी का पाणी होईल”, अशा शब्दांत ज्योती वाघमारे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा