Wardha Crime: जमिनीच्या वादातून अल्पवयीन पुतण्याने काका अन् त्यांच्या मुलावर चाकूने वार करीत त्यांचे जीवन संपविले. नेमकं प्रकरण काय?
नेमकं काय घडलं?
प्रभाकर भलमे (५५) आणि मुलगा रितेश भलमे (२५) रा. बरबडी, अशी मृतांची नावे आहेत. बरबडी येथील प्रभाकर यांच्या महिलाश्रम परिसरातील मित्राच्या मुलाचा लग्न सोहळा वायगाव येथे आयोजित करण्यात आला होता. या लग्न सोहळ्यासाठी ते कुटुंबीयांसह लग्नाला गेले. लग्न आटोपून ट्रॅव्हल्सने परत आले. महिलाश्रम परिसरातून प्रभाकर हे मुलगा रितेश आणि वऱ्हाड्यांसह चहा घेण्यासाठी जात होते. याच सुमारास अल्पवयीन पुतण्या तिथे आला. काही कळायच्या आत सोबत आणलेल्या चाकूने प्रभाकर आणि रितेश या बापलेकांवर हल्ला केला. या हल्ल्यात हे दोघेही गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने सेवाग्राम रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी वर्धा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Satara Accident : मोपेडवरुन शेतात निघालेल्या वृद्ध दाम्पत्याला भरधाव कारने चिरडलं, एकुलती एक लेक पोरकी झाली
आनंदी घर शोकसागरात बुडाले
मित्राच्या मुलाचे लग्न असल्याने प्रभाकर हे आनंदी होते. लग्नाच्या प्रत्येक कार्यात सहभागी होते. मात्र पुतण्याने चाकूने वार करून बापलेकांना संपविल्याने आनंद ओसंडून वाहणारे घर दु:खात बुडाले. आनंदी सूर कानी पडणाऱ्या घरातून आक्रोश ऐकू येऊ लागला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Solapur Crime: यात्रेच्या दिवशी वडिलांनी पिकांना पाणी द्यायला सांगितलं, रागाच्या भरात शेतात गेला; नववीतल्या पैलवान पोरानं आयुष्य संपवलं
ऑनलाइन मागविला चाकू ?
पोलिसांनी तातडीने शोध घेत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला होता. या अल्पवयीन मुलाने ऑनलाइन चाकू मागविला असल्याचे समजते. जागेच्या वादातून आठ महिन्यांपूर्वी या दोघांमध्ये वाद झाला होता. यात परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे. हाच वाद पुढे वाढत गेला आणि खून करण्यापर्यंत पोहचला.
