• Fri. Jun 5th, 2026

    Wardha Crime: जमिनीच्या वादातून पुतण्या जीवावर उठला; बापलेकांना निर्घृणपणे संपवलं, लग्नावरुन परल्यानंतर वऱ्हाड्यांसमोरच हल्ला

    Wardha Crime: जमिनीच्या वादातून पुतण्या जीवावर उठला; बापलेकांना निर्घृणपणे संपवलं, लग्नावरुन परल्यानंतर वऱ्हाड्यांसमोरच हल्ला

    Wardha Crime: जमिनीच्या वादातून अल्पवयीन पुतण्याने काका अन् त्यांच्या मुलावर चाकूने वार करीत त्यांचे जीवन संपविले. नेमकं प्रकरण काय?

    पुतण्याने बापलेकांना संपविले(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, वर्धा : जमिनीच्या जुन्या वादातून अल्पवयीन पुतण्याने काका आणि त्यांच्या मुलावर चाकूने वार करून ठार मारले. वर्धा शहरातील महिलाश्रम परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे, लग्नावरून परतल्यानंतर वऱ्हाड चहा पिण्यासाठी जात असतानाच हा हल्ला करण्यात आला.

    नेमकं काय घडलं?
    प्रभाकर भलमे (५५) आणि मुलगा रितेश भलमे (२५) रा. बरबडी, अशी मृतांची नावे आहेत. बरबडी येथील प्रभाकर यांच्या महिलाश्रम परिसरातील मित्राच्या मुलाचा लग्न सोहळा वायगाव येथे आयोजित करण्यात आला होता. या लग्न सोहळ्यासाठी ते कुटुंबीयांसह लग्नाला गेले. लग्न आटोपून ट्रॅव्हल्सने परत आले. महिलाश्रम परिसरातून प्रभाकर हे मुलगा रितेश आणि वऱ्हाड्यांसह चहा घेण्यासाठी जात होते. याच सुमारास अल्पवयीन पुतण्या तिथे आला. काही कळायच्या आत सोबत आणलेल्या चाकूने प्रभाकर आणि रितेश या बापलेकांवर हल्ला केला. या हल्ल्यात हे दोघेही गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने सेवाग्राम रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी वर्धा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Maharashtra TimesSatara Accident : मोपेडवरुन शेतात निघालेल्या वृद्ध दाम्पत्याला भरधाव कारने चिरडलं, एकुलती एक लेक पोरकी झाली
    आनंदी घर शोकसागरात बुडाले
    मित्राच्या मुलाचे लग्न असल्याने प्रभाकर हे आनंदी होते. लग्नाच्या प्रत्येक कार्यात सहभागी होते. मात्र पुतण्याने चाकूने वार करून बापलेकांना संपविल्याने आनंद ओसंडून वाहणारे घर दु:खात बुडाले. आनंदी सूर कानी पडणाऱ्या घरातून आक्रोश ऐकू येऊ लागला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    Maharashtra TimesSolapur Crime: यात्रेच्या दिवशी वडिलांनी पिकांना पाणी द्यायला सांगितलं, रागाच्या भरात शेतात गेला; नववीतल्या पैलवान पोरानं आयुष्य संपवलं
    ऑनलाइन मागविला चाकू ?
    पोलिसांनी तातडीने शोध घेत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला होता. या अल्पवयीन मुलाने ऑनलाइन चाकू मागविला असल्याचे समजते. जागेच्या वादातून आठ महिन्यांपूर्वी या दोघांमध्ये वाद झाला होता. यात परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे. हाच वाद पुढे वाढत गेला आणि खून करण्यापर्यंत पोहचला.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा