Maharashtra Politics : . केंद्र, राज्य आणि आता मुंबईतही भाजपची सत्ता आल्यामुळे रहेजा नावाच्या बेडकांची डराव-डराव वाढली आहे, अशी टीका मनसेने केली
गजानन काळे काय म्हणाले?
“तुम घाटी लोग सुधारोगे नही” म्हणत मुंबईतील बिल्डर सुशील रहेजा याच्याकडून मराठी तरुणाला मारहाण आणि शिवीगाळ. भारतीय जनता पक्षाचा महापौर मुंबईत अजून बसला नाही, तर ही अवस्था आहे मुंबईतील मराठी माणसाची. केंद्रात, राज्यात आणि आता मुंबईत सत्ता भाजपची आल्यामुळे रहेजा नावाच्या बेडकांची डराव-डराव वाढली आहे, असं गजानन काळे यांनी म्हटलं आहे.
Hemalata Patil : अजित दादांनी 27 तारखेला मला शब्द दिलेला, त्यांचं निधन होताच घाणेरडं राजकारण, NCP नेत्याचा गंभीर आरोप
आता पाहूया आशिष शेलार, अमित साटम आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने सुशील रहेजा तुरुंगात जातो की बाहेर राहतो. मीरा-भाईंदरला मेहता महापौर, तर मुंबईत रहेजा बिल्डरकडून मराठी तरुणाला मारहाण, या घटना सूचक नाही तर धोक्याची घंटा आहेत! असा इशारा काळेंनी दिला आहे. बाकी, रस्त्यावरचा न्याय मनसे आपल्या पद्धतीने करेलच, असं सूचक वक्तव्यही गजानन काळे यांनी केलं आहे.
Ajit Pawar : अजितदादांची आठवण उडत-उडत पायाजवळ आली… ‘तो’ कागद दाखवणारा बारामतीतला व्हिडिओ, विमान अपघातानंतर…
मिरा भाईंदरच्या महापौरपदी मेहता
दरम्यान, मिरा भाईंदर महापालिकेच्या महापौर पदी भाजपच्या डिंपल मेहता ७९ मतांनी विजयी झाल्या आहेत. भाजपने अमराठी चेहऱ्याला उमेदवारी जाहीर केल्याने शहरात पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ मराठी एकीकरण समितीकडून भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. महापौर पदी मराठी चेहऱ्याची निवड व्हावी, अशी मागणी निवडणूक निकालानंतर जोर धरू लागली होती. परंतु भाजपने ही मागणी डावलत मेहतांना संधी दिली. त्यामुळे शहरात मराठी एकीकरण समितीने आक्रमक आंदोलन केले. याआधी काही महिन्यांपूर्वी येथे झालेला मराठी मोर्चाने राज्यभरातील नागरिकांचे लक्ष वेधले होते.
पराभवावर मंथन, मुंबईत मनसेची बैठक पार पडली, राज ठाकरेंनी काय समजावलं?
