Republic Day 2026: केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या देशभरातील पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर करण्यात आली.
देशभरातील ८७४ पोलिसांना राष्ट्रपती पदके देण्यात येणार असून, यामध्ये महाराष्ट्रातील ७५ पोलिसांचा समावेश आहे. त्यात ३१ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना शौर्य पदके, चार पोलिसांना उल्लेखनीय सेवेबद्दल, तर ४० पोलिसांना गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल पदके जाहीर करण्यात आली आहेत. अतिरिक्त पोलिस आयुक्त महेश पाटील, उपायुक्त बाळकृष्ण यादव, एसीपी सायरस इराणी, विठ्ठल कुबडे यांना उल्लेखनीय सेवेबद्दल गौरवण्यात येणार आहे.
Padma Award 2026 : अथांग माया, समर्पण अन् आभाळाएवढी उंची, महाराष्ट्रातील 4 दिग्गजांना पद्म पुरस्कार, देशातील 45 जणांचा होणार सन्मान
गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यातील ४० पोलिसांना राष्ट्रपती पदकांनी सन्मानित करण्यात येणार आहे. पोलिस दलातील गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल पदक विजेत्यांमध्ये महानिरीक्षक राजीव जैन, सुधीर हिरेमठ, अधीक्षक शीला साईल, मोहन दहीकर, पुरुषोत्तम कराड, किरण पाटील, नीलम व्हावळ, अविनाश शिलीमकर, गजानन शेळके, महेश तावडे, विजय माहुलकर, समीर साळुंके, पराग पोटे, दयानंद गावडे, पुष्पलता दिघे, सुनील शिंदे, सुवर्णा शिंदे, अनंत माळी, महेंद्र कोरे, कैलास बाराभाई, विजय मोहिते, भारत सावंत, नरेंद्र राऊत, सतीश निंबाळकर, अफझल खान, प्रदीप सावंत, सुभाष साळवी, प्रमोद वाघमारे, विजयकुमार शिंदे, विक्रम नावरखेडे, विजय देवरे, मनोज गुजर, अजय सावंत, गंगाधर घुमरे, संजय शेलार, महादेव खंदारे, राजकुमार तोलणुरे, बाबासाहेब ढाकणे, शिवदास फुटाणे, सुरेश सोनावणे यांचा समावेश आहे.
Padma Award 2026 : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर, प्रजासत्ताक दिनी सर्वोच्च सन्मान
पोलिस दलात शौर्य बजावणाऱ्या ३१ जणांना गौरवण्यात येणार असून, यामध्ये अमोल फडतरे, वासुदेव मडावी, मधुकर नैताम, संतोष नैताम, विलास पोर्टेट, विश्वनाथ सडमेक, ज्ञानेश्वर तोरे, दिलीप सडमेक, रामसु नरोटे, आनंदराव उसेंडी, राजू चव्हाण, अरुण मेश्राम, नितेश वेलादी, मोहन उसेंडी, संदीप वसाके, कैलास कोवासे, हरिदास कुळयेति, किशोर तलांडे, अनिल आलम, नरेंद्र मडावी, आकाश ऊईके, राजू पुसाली, महेश जाकेवर, रुपेश कोडापे, मुकेश सडमेक, घिस्सू आत्राम, अतुल मडावी, विश्वनाथ मडावी यांचा समावेश आहे; तर सुधाकर वेलादी आणि कारे आत्राम यांना मरणोत्तर शौर्य पदकांनी गौरविण्यात येणार आहे.
