• Mon. Jun 15th, 2026
    Rahul Shewale: मराठी, हिंदू, हिंदुत्व शब्द वगळले; ठाकरेंच्या जाहीरनाम्यावर राहुल शेवाळेंची कडाडून टीका

    Rahul Shewale On Thackeray Manifesto: मराठीऐवजी दुसऱ्या भाषेचा वापर केल्यास ‘खळ-खट्याक’ करणारे आता वचननाम्यातून मराठीची गळचेपी करणाऱ्यांना धडा शिकवणार का? असा सवालही शेवाळे यांनी मनसेला उद्देशून केला.

    thackeray manifesto(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : शिवसेना उबाठा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतेर्फे जाहीर करण्यात आलेल्या संयुक्त जाहीरनाम्यावर शिवसेना शिंदे गटाने कडाडून टीका केली. ‘या वचननाम्यात ४० टक्के इंग्रजी शब्दांचा वापर केला असून विशिष्ट समाजाला खूश करण्यासाठी वचननाम्यातून मराठी माणूस, हिंदु, हिंदुत्व, हिंदुहृदयसम्राट शब्द वगळले आहेत,’ अशी टीका शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केली.

    मुंबईतील बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेवाळे यांनी ठाकरे बंधूवर कडाडून टीका केली. यावेळी पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि राजू वाघमारे उपस्थित होते. ‘वचननाम्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे, पण त्यात आत्मा नाही. बाळासाहेबांचा आदर आणि सन्मान न करणारा उबाठा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा हा शिवसैनिकाला आणि मराठी माणसाला वेदना देणारा आहे,’ असे शेवाळे म्हणाले. ‘संपूर्ण वचननाम्यात ‘हिंदुहृदयसम्राट’ असा उल्लेख टाळून उबाठाने बाळासाहेबांचा जन्मशताब्दी वर्षातच अवमान केला आहे,’ असे शेवाळे म्हणाले.

    Maharashtra TimesBMC Election: मुंबईत सत्तेसाठी भाजपची ‘फिल्डिंग’; 135 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, किती मराठी उमेदवारांना दिली संधी?
    ‘जुनेच मुद्दे कॉपी-पेस्ट’
    ‘मराठी रंगभूमीसाठी दालन, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पालिकेत नोकरी देणे, स्वातंत्र्याची गाथा सांगणारे स्मृतिदालन, अशी आश्वासने २०१७च्या वचननाम्यामध्ये देण्यात आली होती. ठाकरेंनी या वचननाम्यातील मुद्दे पुन्हा कॉपी-पेस्ट करून इंग्रजी भाषेत सादर केले,’ असा टोला शेवाळे यांनी लगावला.

    Maharashtra TimesBMC Election: प्रचाराचा नारळ फुटला; भाजपच्या प्रचाराला मुख्यमंत्र्यांकडून सुरुवात, ठाकरे बंधूंचा वचननामा जाहीर
    वचननाम्यावर मुख्यमंत्र्यांची टीका
    मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी ठाकरे बंधूंच्या वचननाम्यावरही टीका केली. ‘सकाळी एक वचननामा जाहीर झाला. तो त्यांना शनिवारी आई जिजाऊंच्या जयंतीदिनीही प्रकाशित करता आला असता; पण ज्यांना वंदे मातरमची ॲलर्जी आहे अशा लोकांसोबत आमचे जुने मित्र बसायला लागले आहेत. त्यामुळे त्यांना अनेक ॲलर्जी झाल्या आहेत. त्यांचा रविवारचा ‘वचननामा’ नसून तो ‘वाचुननामा’ आहे. त्यांनी काय वाचले हे त्यांनाच कळले नाही. कारण २०१७ च्या निवडणुकीत त्यांनी जी पाच वचने दिली त्यातले एकही वचन यांना पूर्ण करता आलेले नाही,’ असे फडणवीस म्हणाले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा