Train Timetable Change: रेल्वे प्रवाशांसाठी १ जानेवारीपासून मोठा बदल लागू होतोय! मुंबईहून सुटणाऱ्या आणि पुण्याला जाणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळा आता बदलल्या आहेत.
नेमका बदल काय आणि का?
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा आणि गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. १ जानेवारीपासून लागू होणाऱ्या या नवीन वेळापत्रकामुळे मुंबईहून सुटणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांच्या वेळेत ५ ते १५ मिनिटांचा फरक पडणार आहे. अनेक गाड्यांच्या वेळा अलीकडे किंवा पलीकडे करण्यात आल्या आहेत.
‘वंदे भारत’च्या वेळेत बदल
मुंबई-पुणे-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी या मार्गावर धावणाऱ्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या वेळापत्रकात काही मिनिटांचे बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांची वाढती संख्या आणि तांत्रिक सुधारणांमुळे हा बदल करण्यात आल्याचे समजते. यामुळे प्रवाशांना आता सुधारित वेळेनुसार प्लॅटफॉर्मवर उपस्थित राहावे लागणार आहे.
Solapur News: सोलापुरात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठा राडा; भाजप नेत्यांना विरोधकांनी निवडणूक कार्यालयाच्या गेटवरच रोखलं; नेमकं काय घडलं?
या गाड्यांच्या वेळा बदलल्या (प्रमुख गाड्या)
केवळ वंदे भारतच नाही, तर मुंबई-पुणे मार्गावरील ‘लाईफलाईन’ समजल्या जाणाऱ्या इंटरसिटी, सिंहगड एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन यांसारख्या गाड्यांच्या वेळेतही अंशतः बदल होण्याची शक्यता आहे. याशिवाय लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या मुंबईत सकाळी पोहोचतात किंवा रात्री सुटतात, त्यांच्या प्लॅटफॉर्म आणि वेळेत रेल्वेने सुधारणा केली आहे.
प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना
रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी प्रवासाला निघण्यापूर्वी ‘NTES’ (National Train Enquiry System) या ॲपवर किंवा रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर आपल्या गाडीची ‘लाईव्ह स्टेटस’ तपासून घ्यावी. जुन्या वेळापत्रकानुसार स्थानकावर पोहोचल्यास तुमची गाडी चुकण्याची किंवा बराच वेळ ताटकळत उभे राहण्याची शक्यता आहे.
नवीन वर्षातील हा बदल रेल्वेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी उचललेले पाऊल असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
