• Sat. Mar 7th, 2026
    संगमनेरमधील विजय, महापालिकेचा प्लॅन ते रोहित पवारांवर टीका; थोरातांची थेट उत्तरं!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी श्रीरामपूर-संगमनेरच्या विजयावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, श्रीरामपूर व संगमनेरमध्ये मिळालेले यश हे सध्याच्या प्रचाराचे नाही. तर ३० वर्षांच्या प्रामाणिक कामाचे आहे, प्रामाणिक कष्ट करणाऱ्याला जनता उचलतेच. असे ठामपणे सांगत थोरातांनी कार्यकर्ते व नागरिकांचे अभिनंदन केले.यावेळी बोलताना त्यांनी जामखेड नगरपरिषद निकालानंतर काँग्रेसला….‘बी टीम’ म्हणणाऱ्या रोहित पवार यांच्यावर थोरातांनी अप्रत्यक्षपणे तीव्र टीका केली.ते म्हणाले, आम्ही आधीच सांगितले होते की जामखेडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांना….सोबत घ्या. तिथे नेतृत्वाविरोधात तीव्र नाराजी होती. पण तो मान्य झाला नाही.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed