उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देणारी बातमी समोर येत आहे. कारण कल्याण ग्रामीणचे ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर हे उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्क्यावर धक्के दिले जात असतानाच, आता भाजपने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. कारण उद्धव ठाकरे यांना कठीण काळात सोडून न गेलेले माजी आमदार सुभाष भोईर यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. सुभाष भोईर यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या तिकीटावर कल्याण ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. कल्याण ग्रामीण मतदारसंघातील उद्धव ठाकरेंचे खंदे समर्थक म्हणून सुभार भोईर यांची ओळख होती. पण आता सुभाष भोईर यांनीदेखील ठाकरेंना पाठ दाखवली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेपुढे आव्हान वाढणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण ग्रामीणचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार सुभाष भोईर यांचा उद्या भाजप पक्षप्रवेश होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत उद्या सकाळी अकरा वाजता त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. या पक्षप्रवेशावेळी सुभाष भोईर काय म्हणतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे. सुभाष भोईर यांच्या भाजप प्रवेशामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही कल्याण ग्रामीण मतदारसंघात अनेक आव्हानांना सामोरं जाण्याची शक्यता आहे. कारण एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात अनेक विरोधक आता भाजपच्या गोटात सहभागी होताना दिसत आहेत. ‘Manikrao Kokate यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु, फसवणुकीची व्याख्या समजून न घेता…’, वकिलांचा हायकोर्टात जोरदार युक्तिवाद काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्यासह अनेक दिग्गजांनी भाजपात प्रवेश केल्याचं बघायला मिळालं होतं. तसेच अनेक ताकदवान माजी नगरसेवकांनी आतापर्यंत भाजपात प्रवेश केल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत भाजपची ताकद वाढताना दिसत आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशांना जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. Manikrao Kokate यांना चार ब्लॉक, बायपास सर्जरी करावी लागणार, लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांची माहिती दरम्यान, डोंबिवलीत आज कार्यकर्ता मेळावा पार पडला. या कार्यकर्ता मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे उपस्थित होते. डोंबिवली पश्चिमेत हा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. तसेच आगामी काळात कल्याण डोंबिवलीत अनेक ठिकाणी कार्यकर्ता मेळावा घेण्यात येणार असल्याचे संकेत रविंद्र चव्हाण यांनी दिले.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा