• Sat. Mar 7th, 2026

    हरभऱ्याच्या शेतात शिरला बिबट्या; वृद्ध महिलेला फरफरटत नेलं अन्… भयानक दृष्य पाहून पतीचा आक्रोश

    हरभऱ्याच्या शेतात शिरला बिबट्या; वृद्ध महिलेला फरफरटत नेलं अन्… भयानक दृष्य पाहून पतीचा आक्रोश

    Leopard Attack: पारनेर तालुक्यातील किन्ही गावात शेतात खुरपणी करणाऱ्या ६५ वर्षीय भागूबाई खोडदे यांच्यावर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केले. वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

    पारनेर: तालुक्यातील किन्ही गावात मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतात खुरपणी करत असलेल्या भागूबाई विश्वनाथ खोडदे (वय 65) यांच्यावर बिबट्याने अचानक झडप घालत हल्ला केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. शांत गावात दुपारीच दहशत निर्माण करणाऱ्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

    सदर महिला हरभऱ्याच्या शेतात काम करण्यासाठी मंगळवारी, 2 डिसेंबरला, दुपारी गेल्या होत्या. त्या शेतात त्यावेळी एकट्या होत्या. त्यावेळी त्यांच्यावर अचानक बिबट्याने हल्ला केला आणि त्यांना फरपटत नेले. शेजारच्या शेतात त्यांचे पती होते. त्यांनी लगेच आरडोओरड करून मदत मागितली. परंतू, मदत येई पर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

    Maharashtra Timesवडिलांसोबत शेतात गेली, बांधावर उभी; अचानक बिबट्याचा झडप अन्… 9 वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत

    ग्रामस्थांचा वन विभागावर आक्रोश

    किन्ही परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त वावर सुरू होता. गावकऱ्यांनी वन विभागाला पुन्हा पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी केली होती. मात्र, वेळेत प्रतिसाद न दिल्याचा आरोप ग्रामस्थांसह ग्रामपंचायत सदस्य अनिल देठे यांनी केला आहे.वन विभागाचा गलथान कारभार आणि त्याची किंमत एका वृद्ध महिलेला जीवाने चुकवली,असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला.

    नरभक्षकला ठार मारण्याची मागणी

    घटनेनंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत नरभक्षक बिबट्याला ठार करण्याची मागणी जोरात लावून धरली. पिंजरा लावला असला तरी त्या ठिकाणी भक्ष्य नसल्याने बिबट्या पिंजऱ्यात अडकत नाही, त्यामुळे संताप आणखी वाढला. जिल्हा उपवनसंरक्षकांनी नाशिकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून बुधवार सकाळी 11 वाजेपर्यंत शार्प शूटर व आवश्यक आदेश देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले.

    तडजोडीसाठी सत्यजीत तांबेंचा श्रीकांत शिंदेंना फोन, मोठी मागणी; खताळांचा गौप्यस्फोट

    किन्हीत भीतीचे सावट

    या घटनेनंतर किन्ही आणि बहिरोबावाडी परिसरात भीतीचं सावट आहे. महिलांना आणि शेतकऱ्यांना एकटं शेतात जाण्याची भिती वाटू लागली आहे. आता वन विभागाने निर्णायक कारवाई न केल्यास ग्रामस्थ पुन्हा आंदोलनाला करण्याचा इशारा वन विभागाला दिला आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा