Maharashtra Local Body Election Politics : सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशातच, नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषेदच्या नगराध्यक्ष पदाच्या काँग्रेसच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला आहे.
लोहा नगर परिषदेकडे सर्वांचं लक्ष
20 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदासाठी होणाऱ्या लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होणार असल्याचं बोललं जात होतं. काँग्रेसने लोह्यातून सोनू संगेवार यांना नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभे केले होते. काँग्रेसने वंचितसोबत आघाडी केल्याने फायदा मिळणार, असं देखील बोललं जात होतं. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने आश्चर्याचा धक्का दिला.
Ambernath Accident : अंबरनाथमध्ये भीषण अपघात, समोरुन येणाऱ्या चारचाकीने अनेक दुचाकींना उडवलं
76 पैकी 18 अर्ज मागे
सोनू संगेवार हे मागच्या निवडणूकीत पराभूत झाले असले तरी 10 वर्ष नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष पद भोगलेले आहेत. दरम्यान, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणातून काँग्रेसने माघार घेतल्यानं उलट सुलट चर्चेला उधाण आलं. पक्षातील नेत्यांची साथ न मिळाल्यानं उमेदवाराने माघार घेतली, असं देखील बोललं जात आहे. दरम्यान, आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 76 पैकी 18 जणांनी अर्ज मागे घेतल्याने 58 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिल्ह्यात एकंदरीत पाहता नगराध्यक्ष पदासाठी 33 आणि नगरसेवकासाठी 199 उमेदवारांनी माघार घेतली आहे.
जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये लढत
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरवात झाली आहे. सर्व पक्ष स्वबळावर लढत असले तरी बहुतांश ठिकाणी महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात थेट लढाई पाहायला मिळत आहे. हदगाव, देगलूर, लोहा, कंधार, मुदखेड आणि भोकर यासह काही ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आमने-सामने पहायला मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
कट्टर विरोधक एकत्र, अजित पवारांचं राजकारण बदलतंय, बारामतीत नेमक्या काय घडामोडी?
काँग्रेसमध्ये नेतृत्वाची कमतरता
नांदेड जिल्ह्यात 12 नगर परिषद आणि एक नगर पंचायतीची निवडणूक पार पडत आहे. एकंदरीत निवडणुकीची परिस्थिती पाहता जिल्ह्यातील बहुतांश नगर परिषदेवर काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. नांदेड हा काँग्रेस पक्षाचा गड मानला जातो. पण माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपवासी झाल्यानं जिल्ह्याचे राजकीय समीकरण बदलले आहे. बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेसमध्ये भक्कम नेतृत्वाचा अभाव असल्याची चर्चा लोहा तालुक्यात घडलेल्या घडामोडीच्या माद्यमातून सुरु आहे.
