• Mon. Mar 9th, 2026

    कापूस वेचायला गेल्या त्या परतल्याच नाहीत… अन् सायंकाळी शेतात सख्ख्या जावांची बॉडी; दुहेरी हत्याकांडाने नांदेड हादरलं

    कापूस वेचायला गेल्या त्या परतल्याच नाहीत… अन् सायंकाळी शेतात सख्ख्या जावांची बॉडी; दुहेरी हत्याकांडाने नांदेड हादरलं

    Nanded Sisters-in-law killed: माहूर तालुक्यात कापूस वेचायला गेलेल्या दोन सख्ख्या जावांची गळा आवळून हत्या करण्यात आली. त्यांच्या अंगावरील दागिनेही लंपास करण्यात आले. या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात खळबळ उडाली असून, लूटमारीच्या उद्देशाने हा खून झाल्याची चर्चा आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

    अर्जुन राठोड, नांदेड: जिल्ह्यातील माहूर तालुक्यात गुरुवारी (20 नोव्हेंबर) सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या जावांची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. शिवाय हत्येनंतर त्या दोघींच्या अंगावरचे दागिने सुद्धा काढण्यात चोरण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

    माहूर तालुक्यातील पाचोंदा शिवारात आज सायंकाळी ही घटना घडली. अंतकलाबाई अशोक आढागळे ( वय 55) आणि अनुसयाबाई साहेबराव आढागळे(वय 45) अशी मृत महिलांची नावे आहेत. या दुहेरी हत्याकांडामुळे माहूर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    Maharashtra Timesमाथेरानमध्ये अमावस्येची रात्र भयभीत करणारी! स्मशानभूमीत अघोरी पूजेचे अवशेष; नागरिकांमध्ये भीतीचे सावट

    सख्ख्या जावा शेतात गेल्या अन्

    पाचोंदा शिवार हा डोंगराळ भाग असून माहूर शहरा पासून 35 किलो मीटर दूर आहे. अंतकलाबाई आढागळे आणि अनुसयाबाई आढागळे या याच गावातील रहिवासी आहेत. नात्याने ह्या दोघी सख्ख्या जावा आहेत. नेहमी प्रमाणे दोघी कापूस वेचण्यासाठी आजही शेताकडे गेल्या होत्या. स्वतःच्या शेतात कापूस वेचणीचे काम करत असताना अज्ञाताने दोघींची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर अज्ञाताने त्या दोघींच्या अंगावरील दागिनेही चोरले.

    दोघींच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास

    दरम्यान, घटनेची माहिती मिळताच माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके यांनी घटना घटनास्थळी धाव घेतली. यावेळी, दोन्ही महिलेच्या अंगावरील दागिने गायब झाल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. हत्येचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसले तरी दोन्ही महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र गायब असल्याने लुटमारीच्या उद्देशाने सदरील खून झाल्याची चर्चा आहे.

    एका घरात ६ काय १० उमेदवार देतील; प्रताप पाटील चिखलीकर यांची अशोक चव्हाणांवर टीका

    या दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या घटनेने आढागळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान ही घटना लूटमारीशी संबंधित आहे की कोणत्या वैयक्तिक वैमनस्यातून घडली का याचा तपास माहूर पोलीस करत आहेत. शेतात रोज प्रमाणे कापूस वेचण्यासाठी जाणे त्यांच्या जीवावर बेतेल असा कोणीही विचार सुद्धा केला नव्हता.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा