• Thu. Mar 12th, 2026

    ‘2010 मधील रेकॉर्ड तुटेल, काँग्रेसला जनतेकडून उत्तर’; बिहार निवडणूक निकालावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

    ‘2010 मधील रेकॉर्ड तुटेल, काँग्रेसला जनतेकडून उत्तर’; बिहार निवडणूक निकालावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

    Cm devendra fadanvis on bihar election result: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या प्रचंड बहुमतावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमारांच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास दाखवला, असं ते म्हणाले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेऊन, नितिश कुमारांच्या सुशासनावर विश्वास ठेऊन आमच्या घटक पक्षांना बिहारमध्ये प्रचंड मोठं बहूमत दिल आहे. त्यासाठी सर्वांचे अभिनंदन करतो. आताचे कल पाहता 2010 सालचा विक्रम तुटू शकतो अशा प्रकारचा विजय प्राप्त होत आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहार निवडणूक निकालावर पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाले आहेत.

    पंतप्रधान मोदींवर बिहारवासीयांचं प्रेम आहे. जो विश्वास आहे. ते या निकालावरुन स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्री नितिश कुमारांची जी स्वच्छ प्रतिमा आहे त्यावरही या निकालातून शिक्कामोर्तब झालं आहे. याशिवाय एलजेपीचे चिराग पासवान, मांझी, उपेंद्र कुशवाह अशी आमची मोठी चांगली युती बिहारमध्ये झाली होती. या युतीला बिहारमधील जनतेने मोठा प्रतिसाद दिला आहे, असं यावेळी फडणवीस म्हणाले आहेत.

    Maharashtra TimesKolhapur News: भाजपचा मित्रपक्षांना दे धक्का! स्वबळावर लढण्याचा निर्णय, मुख्यमंत्री फडणवीस करणार उमेदवारांची घोषणा

    दुसरं म्हणजे या विजयानंतर काँग्रेस व राहुल गांधी यांनी देशात चालवलेला विषारी प्रचाराला जनतेनं हे प्रत्युत्तर दिलं आहे. सातत्याने संवैधानिक संस्थांचा अपमान करणं, संवैधानिक मार्गाने काम करत असताना त्याला विरोध करणं, जनतेने निवडून दिलेल्या सरकारचा अपमान करणं, जनतेलाही कळलेलं आहे की, हे आरोप म्हणजे आमच्या मतांचा अपमान आहे. त्यामुळे जोपर्यंत राहुल गांधी हे वर्तन ठेवतील तोपर्यंत काँग्रेसची स्थिती अशीच राहील, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.

    आरजेडीपेक्षाही काँग्रेसची हालत खराब आहे. काँग्रेस एमआयएम, कम्युनिस्ट पक्षांपेक्षाही खाली घसरली आहे. काँग्रेसचा बिहारच्या इतिहासातला सर्वात कमी स्कोर आलेला आहे. वोटचोरचा आरोप राहुल गांधींनी केला होता. पण त्यांच्याबरोबरचे पक्ष जोपर्यंत आत्मपरिक्षण करत नाहीत, तोपर्यंत ते निवडून येऊ शकत नाहीत असं फडणवीस म्हणाले आहेत.

    मुख्यमंत्री कोण होणार?

    दरम्यान, बिहारमध्ये मुख्यमंत्री नितिश कुमारांच्या नेतृत्वामध्येच निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी ठरवतील की मुख्यमंत्री कोण होणार, यावर बोलण्याचा अधिकार मला नाही, असं मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा