राजधानी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. त्यानंतर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. शहराच्या सीमांवर सुरक्षा वाढवण्यात आली असून वाहन तपासणीही अधिक कडक करण्यात आली आहे. मुंबई आणि उत्तर प्रदेशमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा आज दुसरा आणि अंतिम टप्पा होत असून १२२ जागांसाठी मतदान सुरू आहे. १,३०२ उमेदवार रिंगणात आहेत आणि ३.७० कोटी मतदार आज मतदानाचा हक्क बजावत आहेत. राज्यात तापमानातही स्वल्प घट दिसत आहे. कोकण वगळता अन्य भागांमध्ये कमाल तापमान ३० अंशांखाली उतरल्याने उकाड्यापासून दिलासा मिळत आहे.
राज्य आणि देशभरातली सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स पाहा एकाच ठिकाणी
