Latur Accident News: लातुरात एका भीषण अपघातात 27 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. तो आपल्या आईला घ्यायला जात असताना हा अपघात घडल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथील तरुण अतूल भरत दिवे हे मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पानचिंचोलीहून निटूरकडे दुचाकीवरून लातूर जहीराबाद राष्ट्रीय महामार्गावरून जात होता. तेवढ्यात कवठापाटीच्या पुढे निटूरहून लातूरच्या दिशेने भरधाव जात असलेल्या आयशर टॅम्पोला दुचाकीची समोरासमोर धडक झाली. अपघातात अतूल गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत घटनेची माहिती पानचिंचोली पोलीसांना दिली. घटनास्थळी पोलीस दाखल होऊन पंचनाम्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह पानचिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला. मयत अतूल यांच्या पश्चात आई, वडील व बहीण असा परिवार आहे.
बॉयफ्रेंडसमोरुन उचलत विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, दोन दिवसात तिघांचा एन्काउंटर
अपघातामधील ट्रक ड्रायव्हरला पुढील उपचारासाठी लातूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदरील टेम्पो हा निटूर येथे बेकरीचे सामान देऊन लातूरच्या दिशेने परत निघाला असताना कवठापटीजवळ हा अपघातात झाला आहे.
लातूर जहीराबाद महामार्गावर अपघाताची शृंखला
लातूर जहीराबाद या महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झालेल्या असल्यामुळे मागील काही दिवसांपासून अनेक अपघात या महामार्गावर घडत आहेत यामध्ये अनेकांनी आपला जीव गमावला असून अनेकांना कायमचे अपंगत्वही मिळाले आहे. रस्त्याचे दुरुस्ती व्हावी यासाठी विविध सामाजिक संघटनांनी आपला पुढाकार नोंदवला मात्र प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षाचा हा बळी असल्याचे बोलले जात आहे….
Latur News: कापूस वेचायला निघाल्या, अचानक नदीचा प्रवाह वाढला अन् मायलेकी वाहून गेल्या, काही तासांनी… भयंकर घटना
महामार्गावरील भेगा तात्काळ बुजवाव्यात
या महामार्गावर वाहतूक करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने दररोज हजारो तरुण लातूरला कामासाठी जात असतात. यामध्ये रस्त्याला मधोमध भेगा पडल्या कारणामुळे खड्डा चुकवण्याच्या नादामध्ये अनेक अपघात घडत असल्याचे कारण समोर येत आहे. या भेगा मागील दोन-तीन वेळेस बुजवणे घेतल्या होत्या मात्र या रस्त्याचे काम निकृष्ट झाले असल्याने हे सर्व प्रकार वारंवार घडत असल्याचे समोर येत आहे. नागरिकांमधून तात्काळ या महामार्गाची दागदोजी व्हावी अशी मागणी समोर येत असताना प्रशासनाने मात्र याकडे पाठ फिरवली आहेत.

