अवकाळी पावसामुळे जालन्यात सोयाबीन, मका, कपाशी, तूर पिकांचे नुकसान झालंय.अतोनात नुकसान झालेलं असताना कर्जमाफी होत नसल्याने शेतकरी संतप्त झालेत.जालन्यातील शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केलाय.शब्द पाळला नाही तर येणाऱ्या निवडणुकीत दाखवून देऊ असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.सरकारने तात्काळ कर्जमाफी व शेतकऱ्यांच्या खात्यात मदत द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.