बच्चू कडू यांनी कर्जमुक्तीसाठी पुकारलेलं महाएल्गार आंदोलन चांगलंच तापलंय.या आंदोलनाची सुरुवात सोमवारी अमरावतीहून ट्रॅक्टर मोर्चाच्या रूपात झाली.सरकारकडून मदतीचं पॅकेज तुटपुंजं असल्याचं म्हणत कडूंनी आंदोलन सुरू केलंय.याआधी मुंबईत बैठकीसाठी बच्चू कडूंनी राज्य सरकारला नकार दिला होता. अखेर बच्चू कडूंनी गुरुवारी मुंबईत भेट घेण्यास संमती दर्शवली आहे.