बच्चू कडू यांनी आयोजित केलेल्या नागपूर येथील भव्य शेतकरी मोर्चात रविकांत तुपकर यांनी अत्यंत स्फोटक भाषण केलं. यावेळी त्यांनी मंत्र्यांना उद्देशून वादग्रस्त वक्तव्य केलं.
“महाराष्ट्रातील आम्ही सर्व शेतकरी नेते एकत्र आहोत. ही एक अभूतपूर्व गोष्ट या ठिकाणी घडताना दिसत आहे. आम्ही वेगवेगळ्या भागात लढतो. पण शेतकऱ्यांची वर्जमुठ एका ठिकाणी आणण्याचं काम बच्चू कडू यांनी केलं आहे. हा मोर्चा अशा ठिकाणी आणला आहे की, समृद्धी महामार्ग बंद, हैदराबाद-जबलपूर मार्ग बंद सगळे रस्ते बंद केले आहेत. बच्चू कडू यांनी फार सर्वेक्षण केलेलं आहे. कारण इथून एकही गाडी पास होणार नाही. सरकारचं नाक दाबल्याशिवाय सरकारचं तोंड उघडत नाही”, असं रविकांत तुपकर म्हणाले.
“तुकड्या तुकड्यात लढण्यापेक्षा एका ठिकाणी येऊन लढलो तर आपली सगळ्यांची ताकद मोठी होईल. आज सोयाबीन साडेतीन ते चार हजार रुपयांनी विकलं जात आहे. सोयाबीनचं एक क्विंटल उत्पादनासाठी साडे सात हजार रुपये खर्च येतो आणि बाजारात तीन ते साडेतीन हजार रुपये भाव मिळत आहे. कापसाची देखील तीच अवस्था आहे”, अशी खंत तुपकर यांनी व्यक्त केली.
“जातीचा मोर्चा निघाला की सरकार आंदोलनस्थळी चर्चेसाठी येतं. मग आज आमच्या मातीचा मोर्चा निघाला तर तुम्ही इथे का येऊ शकत नाहीत? हा आमचा सरकारला सवाल आहे. आम्ही तुमच्या दारात येणार नाहीत. तुम्हाला चर्चा करायला शेतकऱ्यांच्या दारात नागपूरच्या वेशीवर यावं लागेल”, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
“मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सांगतात की, बैठक बोलावली होती पण चर्चेला आले नाहीत. अरे विधानसभेची निवडणूक होऊन एक वर्ष झालं. पण तुम्ही कर्जमुक्ती केली नाही. आम्ही भीक मागायला आलो नाहीत. सोयाबीनला भाव देता येत नाही. सोयाबीन निर्यात होत नाही. परदेशात निर्यात करा. सोयाबीनचे योग्य भाव मिळतील. कापसाची आयात करण्यापेक्षा निर्यात करा. कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे”, असं तुपकर म्हणाले.
सुषमा अंधारे यांनी थेट पुरावे दाखवले, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात स्फोटक पत्रकार परिषद
‘अरे हरामखोरांना…’
“अरे हरामखोरांना तुमच्या भवनामुळे आमच्यावर कर्ज झालं. आमच्यामुळे आमच्यावर कर्ज झालेलं नाही. सोयाबीनमध्ये लुटलं. कापसात लुटलं, ऊसात लुटलं म्हणून आम्ही कर्जाबाजारी झालो. त्यामुळे कर्जमुक्तीचा आम्हाला नैतिक अधिकार आहे”, असं ते ठामपणे म्हणाले.
“आपली अवस्था बदलायचं असेल तर आपल्याला आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावं लागेल. आम्ही भीक नाही तर हक्क मागायला आलो आहोत. सरकारला ववाटत असेल की, आमच्याकडे बहुमत आहे. या शेतकऱ्यापेक्षा देशात कोणतंच बहुमत मोठं नाही हे लक्षात ठेवा”, असं रविकांत तुपकर म्हणाले.
तुपकरांची मंत्र्यांना शिवीगाळ
“नेपाळमध्ये जसं मंत्र्यांना तुडवून तुडवून हाणलं, नेपाळचे मंत्री देश सोडून पळून गेले. लक्षात ठेवा. मी तर बच्चू भाऊंना म्हणेन, नागपूरनंतरचा चौथा टप्पा मुंबईचा ठेवा. सा***, हरामखोरांना मुंबई आणि महाराष्ट्रातून जावं लागलं पाहिजे. त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. सरकार आपल्याशी नीट वागणार नसेल तर सरकारच्या उरावर बसावं लागेल. माझ्यावर शंभर केसेस आहेत. तुम्ही म्हणाल, खिसे कापतो की काय तर नाही गेल्या 22 वर्षात अनेकांचं माज उतरवण्याचं काम केलं आहे”, असा घणाघात रविकांत तुपकर यांनी केला.
तुपकरांचं वादग्रस्त वक्तव्य
“इथे मंचावर बसेलेल्या प्रत्येकावर केसेस आहेत. पोलिसांच्या बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील पण नागपूरमध्ये आमच्या छात्या कमी पडणार नाहीत हे लक्षात ठेवा. आम्ही मरायला आलो आहोत. आम्ही असे मरणार नाहीत. तुमच्यासारखे पाच-दहा घेऊन गेल्याशिवाय राहणार नाहीत. आता इथून पुढे आत्महत्या करायची नाही. कितीही संकट आलं तरी मरायचं नाही. जसं बच्चू भाऊंनी सांगितलं की, दोन-चार आमदारांना कापा. तसं मी सांगतो की, दोन-चार मंत्र्यांना कापा. पण आता मागे हटायचं नाही”, असं वादग्रस्त वक्तव्य रविकांत तुपकर यांनी केलं.

