परतीच्या पावसानंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. आधीच अतिवृष्टीने नुकसान झालेला शेतकरी या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. मुंबईसह उपनगरातही जवळपास रोज संध्याकाळी पाऊस पडतो आहे. हवामान खात्याने कोकणात पुढील दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट दिला असून वादळी वारे, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकणातील आंबा, काजू बागायतदार अशा पावसाने धास्तावले आहेत.
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर
