राज्यात काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने मान्सून परतल्याचं सांगितलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या १५ ऑक्टोबरपासून पाऊस सक्रीय होऊ शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. राज ठाकरे – उद्धव ठाकरे एकत्र निवडणूक लढवणार असल्याची चर्चा असून दुसरकडे यंदा शरद पवार यांचं कुटुंब बारामतीतील गोविंद बागेत एकत्र दिवाळी साजरी करणार नसल्याचं बोललं जात आहे.
Maharashtra Live News 13th October 2025 : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज वाचा एकाच ठिकाणी
