Nagpur Vehicle Collision One Murder : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, नागपुरात 30 सप्टेंबरला एका तरुणाची गाडीला कट मारल्यामुळे हत्या करण्यात आली होती. या हत्येतील दोन आरोपींना आता अटक करण्यात आली आहे.
30 सप्टेंबरला सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास तो गाडीने बुटीबोरीकडे येत होता. कोलार परिसरात योगेशच्या गाडीचा कट आदित्यचा गाडीला लागला. दोघांनी त्याला थांबविले. त्याला जबर मारहाण केली व पसार झाले. नागरिकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. आदित्य व हिमांशूने मारहाण केल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. बुटीबोरी पोलिसांनी मंगळवारी खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आदित्य व हिमांशूची 10 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
मोपेडवरून फिरणारा दिग्गज माजी आमदार हरपला, शरद पवारांचे विश्वासू साथीदार, माजी मंत्री शामराव अष्टेकर यांचं निधन
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील कलाकाराला नागपुरात संपवलं
बॉलिवूडच्या ‘झुंड’ या चर्चित चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा तरुण कलाकार प्रियांशु क्षत्रिय उर्फ बाबू छत्री याची निर्घृण हत्या झाल्याने नागपूर शहर हादरले आहे. मंगळवारी मध्यरात्री नारा परिसरात घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्याचाच मित्र धूप शाहू याला अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांशु क्षत्रिय हा मंगळवारी रात्री आपल्या मित्र धूप शाहूसोबत बाहेर गेला होता. रात्री उशिरा नारा परिसरातील काही नागरिकांना तो वायरने बांधलेला, गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याच्या शरीरावर चाकूचे अनेक वार होते. नागरिकांनी तत्काळ जरीपटका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रियांशुला मेयो रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
तलावाचं काम करण्यासाठी आले, त्याच तलावात पोहण्यासाठी जाणं पडलं महागात; दोघांचा बुडून मृत्यू
प्राथमिक तपासानुसार, प्रियांशुवर धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आले होते. प्रियांशुच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी संशयित धूप शाहू याला अटक केली आहे. नशेत झालेल्या वादातून ही हत्या घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

