Nagpur Woman Ends Life: नागपूरमध्ये एका धक्कादायक घटनेत, मूल होत नसल्याने छळ सहन न झाल्याने एका विवाहितेने आत्महत्या केली. पती आणि सासूकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले.
मृत महिलेचे नाव अर्चना नितीन पाटील (वय 45) असे असून, तिचा विवाह 2009 मध्ये नितीन दिनकर पाटील (वय 45) यांच्यासोबत झाला होता. दोघेही नागपूरच्या बोरगाव येथे नितीनच्या आई शारदा दिनकर पाटील (वय 65) यांच्यासह राहत होते. या वर्षी 16 सप्टेंबर रोजी अर्चना यांनी घरातील रश्शीचा उपयोग करून गळफास घेतला. सुरुवातीला आत्महत्येचे कारण स्पष्ट नसल्यामुळे पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली होती आणि तपास सुरू केला होता.
Pune News: काय झाडी, काय डोंगर; चोरी करुन थेट गुवाहाटी गाठलं, पण सारी हुशारी पुणे पोलिसांसमोर फेल, पाहा काय घडलं?
त्यानंतर अर्चना यांचे वडील कृष्णत गणपत हरगुडे (वय 71, रा. ऐरोली, नवी मुंबई) यांनी आपल्या मुलीच्या कुटुंबीयांवर आरोप करत पोलिसांकडे तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर पोलिसांनी अधिक सखोल तपास केला, त्यात समजले की लग्नानंतर काही वर्षे कुटुंबात मूल न होत असल्याने अर्चना यांचे पती व सासू यांच्याकडून सतत शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. कुटुंबातल्या या असह्य परिस्थितीमुळे ती मानसिकदृष्ट्या त्रस्त झाली होती. अखेर, या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली.
हरगुडे यांच्या तक्रारीवरून गिट्टीखदन पोलिसांनी अर्चना यांचा पती नितीन व सासू शारदा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोघांनाही आत्महत्येस प्रवृत्त करण्यासह विविध कलमान्वये दोषी ठरवण्याच्या उद्देशाने गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नागपूर पोलीस दलाचे पीएसआय पठाण यांच्या देखरेखीखाली तपास सुरू केला असून, दोघांनाही अटक केली आहे.
चंद्रकांतदादांच्या विधानावर मौन सोडलं, गौतमी पाटील स्पष्टच बोलली
सांगलीमध्ये नवविवाहतेची आत्महत्या
दरम्यान, सांगली जिल्ह्यातही नुकतीच अशीच एक घटना घडली आहे. जिल्ह्यातील इश्वरपूर येते सासूच्या औषध उपचारासाठी माहेरून दोन लाख रुपये आणण्यासाठी नवविवाहिता अमृता गुरव हिचा छळ केला जात असून या छळाला कंटाळून तिने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.

